/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

Romance डॉलर बहू

adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

चंद्रूचं बोलणं गौरम्मांना किती समजलं कोण जाणे; पण हे ठाऊक असूनही चंद्रू आपलं मन मोकळं करत होता.
काही क्षण गौरम्माही विचारात पडल्या.
नंतर त्या म्हणाल्या, `चंद्रू, श्रीकांतला बायको नाही आणि ताराला नवरा नाही. त्या दोघांनी का एकमेकांशी लग्न करू नये?’
`असं कसं शक्य आहे, अम्मा? श्रीकांतचं विवाहाच्या संदर्भात मन विटलं आहे. दुसरं म्हणजे त्या दोघांची परस्परांशी ओळख आहे, तरीही दोघे याविषयी मौन बाळगून आहेत. त्यासाठी त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल. मी यात पडून मैत्री गमवायला मुळीच तयार नाही.’
गौरम्मांना हे मुळीच पटलं नाही. रामदेवाच्या दर्शनाला देवळात गेलेल्या असताना सहज गप्पांच्या ओघात `इथं एक मुलगा लग्नाचा आहे’, `तमक्यांची मुलगी लग्नाची आहे’ एवढं सांगून कितीतरी लग्न ठरल्याचं त्यांनी जवळून पाहिलं होतं.
इथलं पाहावं तर सगळंच वेगळं! असला कसला देश हा कोण जाणे!
श्रीकांतच्या घरी ते जाऊन पोहोचले तेव्हा दुपार झाली होती. घराची मालकीण नसल्यामुळे ते भलं मोठं घर सुनं-सुनं वाटत होतं.
ते पोहोचले तेव्हा श्रीकांत घरात नव्हता. तो कुठं तरी कामावर गेला होता. पण एक सुदृढ, उमदा तरुण त्यांची वाट पाहत होता. त्यांना ओळखून त्यानं सांगितलं, `श्रीकांत संध्याकाळी येतील. तोपर्यंत तुम्ही आमच्या घरी चला.’
आश्चर्य म्हणजे तो कन्नडमध्ये बोलला. त्याचं बोलणं अत्यंत नम्र होतं. सगळ्यांनी त्याची विनंती मान्य केली. त्यानं स्वत:ची ओळख सांगितली.
`मला नाथ म्हणतात. मी मूळचा बेंगळूरचा. इथं येऊन साडेतीन वर्षं झाली.’
`काय काम करता तुम्ही?’ चंद्रूनं विचारलं.
`आधी श्रीकांतनी आपल्या कंपनीत छोट्या कामासाठी म्हणून आणलं. इथं आल्यावर काही दिवसांत मी स्वत:चा व्यापार सुरू केला.’
`कसला व्यापार?’
नाथनं अभिमानानं सांगितलं, `या छोट्या गावात मी इंडियन स्टोअर’ सुरू केलं. यानंतर इंडियन रेस्टॉरंटही सुरू केलंय. आधी सगळा व्यापार फक्त संध्याकाळीच करत होतो. सकाळी श्रीकांतकडे काम करत होतो. त्यांनीच मला या व्यवसायात पूर्णपणे पडायला सांगितलं. एवढंच नव्हे, सुरुवातीला त्यांनी मला धनसहाय्यही केलं. सर, माझ्या दृष्टीनं तेच माझे देव!
त्याच्या बोलण्यातून श्रीकांतचं आणखी एक कनवाळू रूप समोर आलं.
नाथाचंही तीन बेडरूम असलेलं घर होतं. घर बेताचं असलं तरी नीटनेटकं होतं. पाहुण्यांसाठी त्यानं रेस्टॉरंटमधून अनेक प्रकारचे खाद्दपदार्थ आणून ठेवले होते.
त्याची पत्नी मालती हसतमुख होती. तिनं पाहुण्यांचं मनापासून स्वागत केलं. आग्रह करून तिनं सगळ्यांना जेवू घातलं. सगळ्यांना बरं वाटलं.
मालती घरातच मोती, पोवळी, खडे यांचा व्यापार करायची. शिवाय नवऱ्यालाही त्याच्या कामात ती मदत करत होती.
नाथनं सांगितलं, `मला बेंगळूरमध्ये पार्ट-टाईम नोकरी होती. खूपच ओढाताण व्हायची. आता मीच लोकांना नोकरी देतो. केवळ साडेतीन वर्षांत एवढा फरक झालाय! मला तर हा देश फार आवडला. इथं कशाचीच कमतरता नाही. मी इथं न येता तिथंच राहिलो असतो तर कुठं तरी कारकून होऊन खर्डेघाशी करत बसलो असतो. या देशाला कुणी नावं ठेवू लागलं तर मला मुळीच आवडत नाही. मी काही तुमच्याइतका शिकलेला नाही. मला जे वाटलं ते बोललो.’
त्याचं काही खोटंही नव्हतं. बेताचं शिक्षण घेतलेल्या मुलाचं भारतात काय भविष्य आहे? त्याची कष्ट करायची तयारी असली तरी तशी संधी कुठं मिळते?
रात्री श्रीकांत आला. नाथाच्या हॉटेलात सगळे रात्री जेवले. नाथानं कुणाच्याच जेवणाचं बिल घेतलं नाही.
निघायची वेळ झाली. गौरम्मांनी चौकशी केली, `बेंगळूरमध्ये तुमचं घर कुठल्या भागात आहे?’
`जयनगर भागात. सदोतिसाव्या क्रॉसच्या अगदी अखेरीस. अर्थात तिथं नाथ म्हटलं तर कुणाच्याही लक्षात येणार नाही. गोपीनाथ माझं नाव. आमच्या कंपनीत दोन गोपीनाथ झाले, त्यामुळे त्याला गोपी हे नाव पडलंय आणि मला नाथ म्हणतात, आमचं जुनं घर पाडून त्या जागी `श्रीकांत काँम्लेक्स’ करायचा माझा विचार चाललाय.’
गाडीनं वेग घेतला. गौरम्मांचं डोकं गरगरल्यासारखं झालं. कारण हा नाथ म्हणजे कोण हे त्यांच्या स्पष्टपणे लक्षात आलं होतं.
याच गोपीनाथशी लग्न करायची सुरभीची इच्छा होती आणि त्या वेळी आपणच `हा नको- आपण अमेरिकेचा नवरा शोधू या’ असं सांगून तिला त्यापासून परावृत्त केलं होतं. त्या वेळी विनिता आणि गिरीशनं `मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे?’ असंही म्हटल्याचं आठवलं.
त्या वेळी आपण संतापानं `तू तुझ्या मुलीला दिली असतीस काय?’ म्हणून विचारलं होतं.
खरोखरच सुरभीचं याच्याशी लग्न झालं असतं तर मालतीच्या जागी तीच दिसली असती.
गौरम्मांनी नि:श्वास टाकला.
एका दुपारी चंद्रूनं घरी फोन केला. फोन गौरम्मांसाठी होता. `अम्मा, अर्ध्या तासात तयार हो. तुला लगेच शिकॅगोला गेलं पाहिजे.’
`का रे? आणि तुम्ही?’
`ते सारं आल्यावर सांगेन.’
तपशील समजला नाही, तरी गौरम्मा एका किटमध्ये चार साड्या कोंबून तयार झाल्या.
घरी आलेल्या चंद्रूनं सांगितलं, `अम्मा, पद्माचा फोन आला होता. राजीव आणि तारा इंडियाला गेले आहेत. पद्माच्या थोरल्या मुलाला खूप ताप आलाय म्हणे. तिच्या बाळंतपणाला आणखी पंधरा दिवस आहेत, पण त्या घाबरल्या आहेत. सोबतीला कोण येईल असं वाटून त्या रडू लागल्या.’
`अरे, दिवस भरलेल्या गर्भारशी अशी एकटी टाकून राजीव-तारा आता का गेले?’
`त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय म्हणे. त्यांचं काही सांगता येत नाही. एकच मुलगा आणि एकच मुलगी. अखेरच्या क्षणी त्यांना न जाऊन कसं चालेल?’
`तेही खरंच आहे म्हणा!’
असं म्हणाल्या तरी गौरम्मांना पद्माविषयी कणव दाटून आली. त्या म्हणाल्या, `तू आणि जमुना चार दिवस मुलीकडे पाहा. मी पद्माकडे राहायला जाते. अचानक बाळंतीण झाली तर अगदी अनाथासारखं वाटायला नको तिला! बाळंतपण केलं तर काशी यात्रेचं पुण्य मिळतंय बाबा!’
प्रथमच चंद्रूच्या मनात आईविषयी अभिमान दाटून आला. डॉलरवरच्या अपरिमित प्रेमापायी विनितेच्या मनाला होरपळून टाकणाऱ्या गौरम्मा परक्या स्त्रीच्या दु:खामुळे मृदू झाल्या होत्या. आपण होऊन मदतीसाठी जाण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. यापुढे त्याला मागं घडून गेलेल्या गोष्टी गौण वाटल्या.
पद्माचा फोन येताच चंद्रूनं तिला सांगितलं होतं, `तुम्ही काहीही काळजी करू नका! मी माझ्या आईला तुमच्याकडे पाठवून देतो. ट्रेल बसनं पाठवून देईन तिला. उतरवून घ्यायला कन्नड येणाऱ्या कुणाला तरी पाठवून द्या. कारण तिला कन्नडशिवाय दुसरी कुठलीही भाषा येत नाही. शिवाय तिनं एकटीनं कधीच प्रवास केलेला नाही.’
हे सांगताना `अम्मानं घाबरून जायला नकार दिला तर?’ असा विचारही त्यानं केला नव्हता.
घाईनं निघताना, तेवढ्याच वेळात गौरम्मांनी गावाकडून आणलेल्या शेवया आणि पापड सोबत बांधून घेतले.
चंद्रूनं जमुनाला फोन करून सारं सांगितलं. बहुधा तिला गौरम्मांचं अचानक निघून जाणं आवडलं नसावं. कारण चंद्रू फोनवर थोड्या रोषानंच सांगत होता,
`जमुना, तुला त्रास होणार असेल तर तू चार दिवस रजा घे. मानसीलाही तुझ्या मैत्रिणीच्या घरी कदाचित ठेवावं लागेल. अम्माला मात्र मी ठरल्याप्रमाणे पाठवून देणार आहे!’ आणि त्यानं फोन आपटून ठेवला. गौरम्मांना मात्र त्यानं काहीही सांगितलं नाही.
मानसीला थोपटत तो म्हणाला, `अम्मा, अगदी शेवटच्या स्टॉपवर उतरायचं. कितीही वेळ लागला तरी तिथंच उभी राहा. कुणी कन्नडमध्ये बोललं तरच त्यांच्याबरोबर घरी जा. घरी जाऊन पोहोचताच पद्माला इथं फोन करायला सांग. वाटेत हात-खर्चाला हे शंभर डॉलर्स राहू दे. हा कागद जपून ठेव. यावर इथला आणि पद्माचा घरचा फोन नंबर आहे. तू घाबरू नकोस. जमुनाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.’
`पण मानसीला कुठं ठेवशील?’
`तू त्याची काळजी करू नकोस. सगळी व्यवस्था होईल. तू निश्चिंतपणे गावाला जाऊन ये.’
चंद्रूनं गौरम्मांना ट्रेलबसमध्ये बसवून दिलं. काय ती बस! किती मोठी आणि आरामशीर तर इतकी की कल्पना करणंही कठीण! पण बसमध्ये अगदीच मोजके प्रवासी होते.
अंबाडा बांधून कासोट्याचं लुगडं नेसलेल्या आणि वर कोट घातलेल्या गौरम्मांकडे अनेकांनी दृष्टी टाकली.
गौरम्मांनी सभोवताली पाहिलं. खिडकीपाशी एक त्यांच्याच वयाची गोरी प्रौढा बसली होती. त्या तिच्यापाशी जाऊन बसल्या. यावरच्या तिच्या प्रतिक्रियेचा मात्र त्यांना धक्का बसला. तिनं त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त करणारा कटाक्ष टाकला आणि ती ताडकन उठून दुसऱ्या जागी बसली!
गौरम्मांना कुणी तरी मुस्काटात मारावं तसं झालं. पाठोपाठ त्यांना बेंगळूरात घडलेली एक घटना आठवली.
एकदा दुपारी गौरम्मा सिटी मार्केटच्या बसमध्ये चढल्या. त्यांच्या घरासमोरचा रस्ता झाडणारी मुक्तालम्बाही त्याच बसमध्ये चढली आणि त्यांच्या शेजारची जागा रिकामी असल्यामुळे तिथे येऊन बसली. त्या वेळी गौरम्मांचा संताप शिगेला पोहोचला होता. काय हे! रस्ता झाडणाऱ्या मुक्तालम्बानं आपल्याला खेटून बसण्याइतकी सलगी दाखवायची म्हणजे काय! त्या वेळी त्याही अशाच ताडकन उठल्या होत्या.
या अमेरिकेत मीही मुक्तालम्बाच आहे काय?
तोंडातून अवाक्षर न काढता त्या बाईनं `मी गोरी- तू काळी’ हे वागण्यातून स्पष्टपणे दाखवून दिलं होतं!
गौरम्मांना तीव्रपणे जाणवलं- आपल्याला या क्षणी जे वाटलं, तेच त्या वेळी मुक्तालम्बालाही वाटलं असेल ना! काही झालं तरी या गोऱ्यांशी आपलं जमणं शक्य नाही. आपल्याच विचारांच्या तंद्रीत गौरम्मा खिडकीबाहेर पाहत बसल्या.
शिकॅगोच्या बसस्थानकावर गौरम्मा उतरल्या तेव्हा त्या गांगरून गेल्या होत्या. न्यायला कुणीच आलं नाही तर काय करायचं? आपल्याला भाषाही येत नाही!
अर्धा-एक तास गेला असेल.
`तुम्ही गौरम्मा ना?’ अचानक गौरम्मांच्या कानांवर कन्नड शब्द पडले. त्यांनी वळून पाहिलं- पन्नाशीच्या घरातली एक स्त्री त्यांच्याशी बोलत होती.
`होय. तुम्ही?’
`मी वत्सला. पद्मानं फोन करून सांगितलं होतं. ट्रॅफिक जाम झाल्यामुळे अर्धा तास उशीर झाला मला. क्षमा करा.’
दोघीही वत्सलाच्या गाडीत बसल्या. वाटेत गौरम्मांनी आपण होऊन चौकशी केली तेव्हा थोडी माहिती मिळाली.
वत्सलाचं माहेर बीदर. नवरा रुदेश मैसूरचा. इथं येऊन अठ्ठावीस वर्षं झाली होती. कुठल्याशा मोठ्या कंपनीमध्ये ते वरच्या जागेवर नोकरी करत होते.
त्या घरी पोहोचल्या तेव्हा पद्मा त्यांचीच वाट पाहत उभी होती. वत्सलानं त्यांना सोडलं आणि तशीच बाहेरच्या बाहेर निघून गेली.
गौरम्मांना पाहताच पद्माला समाधान वाटलं. ती बोलू लागली,
`तुम्ही याल की नाही असं वाटलं होतं! जमुना काय म्हणेल असं वाटलं होतं. मला तर खूप भीती वाटते!’
`बाळंतपणाला एवढं काय घाबरायचं बाईच्या जातीनं? आमची नाही का बाळंतपणं झाली? आता तर मीही आलेय ना!’
दोघी घरात आल्या. पद्मा म्हणाली, `तुमचा काळ वेगळा होता. देशही वेगळा होता. त्या वेळी घरात कितीतरी मोठ्या बायका असायच्या. इथं आम्हीच घुबडासारखे राहत असतो ना! कुणाचीच सोबत नसते.’
`पद्मा, घरी फोन करून मी येऊन पोहोचल्याचं चंद्रूला कळवता का? त्यानं अगदी बजावून सांगितलंय.’
`पद्मा, घरी फोन करून मी येऊन पोहोचल्याचं चंद्रूला कळवता का? त्यानं अगदी बजावून सांगितलंय.’
पद्मानं लगेच चंद्रूला फोन करून गौरम्मा पोहोचल्याची बातमी कळवली.
पद्माच्या मुलाचा विकासचा ताप उतरला असला तरी चेहरा सुजला होता.
`डॉक्टरांनी असलेलीच औषधं सुरू ठेवायला सांगितलंय. इथून दहा मैलांवर त्यांचं शॉप आहे. मलाच गाडी चालवायला हवी ना! पोटात दुखल्यासारखं होतं.’
`तुमच्या यजमानांच्या ऑफिसमधला शिपाई असेल ना! त्याला तात्पुरतं घरी झोपायला बोलवायचं.’
`इथं तशी पद्धतच नाही ना! प्रत्येकजण आपापल्या कामांमध्ये गुंतलेला असतो. प्रकृती ठणठणीत असताना इथं राहावं बघा! प्रकृतीच्या अडचणी असतील तर कुणीही मदत करायला येत नाही. कुणालाही वेळ नसतो इथं!’ दुखावलेली पद्मा मोकळेपणानं बोलत होती.
गौरम्मांनी लवकरच स्वयंपाकघराचा ताबा घेतला आणि आजारी विकाससाठी काढा उकळायला ठेवला. पद्मानं विचारलं, `काय हे? कुणासाठी?’
`तुझ्या आजारलेल्या विकाससाठी. आम्ही आमची मुलं अशीच वाढवली आहेत. हवं तर उद्दा डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या.’
मुलाला काढा पाजत पद्मा म्हणाली, `अपॉइंटमेंट असल्याशिवाय हे शक्य नाही.’
एवढ्यात फोन वाजला. राजीवचा फोन होता. फोनवर बोलल्यानंतर पद्माचा चेहरा आणखी उतरला.
`माझे सासरे वारले! आता आणखी पंधरा दिवस त्यांना येता येणार नाही म्हणत होते. तुम्ही आल्याचं सांगितलंय त्यांना. तुम्हीच सांगा, इथं दिवस भरलेल्या बायकोला टाकून गेलेत! त्यांना समजायला नको काय?’
`अगं, पण मुलानंच अंत्यविधी केले पाहिजेत ना! ते त्यांचं कर्तव्य नाही काय?’
`पण जिचा हात धरलाय, त्या बायकोच्या संदर्भातही कर्तव्ये नाहीत काय? तुम्ही बघताय- घरात आजारी मूल- मी अशी! तुम्ही आहात म्हणून ठीक आहे. नाही तर माझे किती हाल झाले असते!’
दोनेक दिवसांत विकास बरा झाला. त्याला घेऊन दवाखान्यात जाताना पद्माच गाडी चालवत होती. जाताना गौरम्मा काळजीयुक्त स्वरात म्हणाल्या, `सावकाश चालव गाडी! आधीच गर्भारशी तू!’
`इथं तसं चालत नाही, अम्मा! रस्त्यावरन अमुकच वेगानं गेलं पाहिजे असा कायदा आहे!!’ पद्मा म्हणाली.
पद्मासाठी गौरम्मा दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, खिरी आणि इतर खाद्यपदार्थ करत होत्या. मधूनच काढे पाजत होत्या. इतरही खाद्यपदार्थ करून तिला कौतुकानं वाढत होत्या, आग्रह करत होत्या.
एकदा त्या उत्साहानं म्हणाल्या, `मला बोलवायला त्या वत्सला नावाच्या बाई आल्या होत्या ना? त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना बोलाव हवं तर! मी खाणं-पिणं करेन.’
`वत्सला शक्यतो कुणाच्याही घरी जात-येत नाही.’
`का?’
`ती एक मोठीच कथा आहे. वत्सलाचे आई-वडील खेड्यात राहायचे म्हणे. वत्सला हुशार असूनही तिच्या आई-वडिलांनी तिचं लवकर लग्न लावून दिलं. तिला शिक्षणाची खूप आवड. इथं येऊन ती शिकली.’
`त्रास झाला असेल पण!’
`होय ना! त्या वेळी इथं इतके भारतीयही नव्हते. मुलाला बेबी-सिटिंगमध्ये ठेवून रात्रं-दिवस अभ्यास केला. घरचं सगळं करून. नंतर मात्र चांगली नोकरी लागली.’
`किती मुलं तिला?’
`एकच मुलगा आहे. अशोक त्याचं नाव. पण-’
`का? काय झालं? संसारात किरकोळ खटके उडाले की संसारच मोडतात इथं! तसं काही झालं का?’
`छे:! तसं काही नाही. तुमची काही तरी चुकीची समजूत झाली आहे. वत्सलेचे यजमान रुद्रेश अतिशय चांगले गृहस्थ आहेत. नवरा-बायको परस्परांशी अत्यंत प्रेमानं राहतात. दोघांनीही इथं चांगलं नाव कमावलं. राजवाड्यासारखी चार घरं आहेत त्यांची. घरात चार गाड्या आहेत. भरपूर पैसा मिळवलाय त्यांनी.’
`मग त्रास कसला आहे?’
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

`अशोकचाच त्रास! तो लहान असताना त्याला सांभाळण्यासाठी वत्सलानं घरी एक नोकर ठेवला होता. काम मात्र सोडलं नाही. आणखी मूल झालं तर सांभाळायचा त्रास होईल म्हणून मूल होऊ दिलं नाही. त्यामुळे अशोक एकटाच वाढला. आई-वडील सतत कामाच्या निमित्तानं घराबाहेर असतात. घरात आजोबा-आजी किंवा आणखी कुणी नसतं. येणारी-जाणारी आत्ते-मामे-मावस-चुलत भावंडं नाहीत. तो सोळाव्या वर्षीच घराबाहेर पडला.’
`काही भांडण झालं काय?’
`झाल्याशिवाय कसं राहील? वाईट मित्रांच्या नादानं त्याला ड्रग्सचं व्यसन लागलं. पिणंही आहेच. घरात इटालियन, स्पॅनिश, कोलंबियन अशा वेगवेगळ्या संस्कृतीच्या आणि भाषांच्या लोकांची वर्दळ असल्यावर कशी चांगली संस्कृती राहणार? घरात मोठी माणसं असली की मुलं चांगल्या सवयी शिकतात.’
`अगदी खरंय बाई तुझं! आमचा हर्ष- तुला सांगते, आजोबांची पूजा झाल्याशिवाय दूध पीत नाही!’ गौरम्मांच्या अंतर्मनाच्या कोपऱ्यातून नातवाची आठवण वेगानं वर आली.
`आधी या दोघांच्या ते लक्षातच आलं नाही’ पद्मा पुढे सांगत होती, `नंतर घरातले पैसे अदृश्य होऊ लागले तेव्हा संशय आला. मग मात्र एक दिवस पाळत ठेवून त्यांनी मुलाला पकडलं. भांडण झालं.’
`दोन दणके द्यायला हवे होते!’
`इथं तसं करता येत नाही. आई-वडिलांनी मुलांना छळलं तर मुलं पोलिसात तक्रार देतात. मुलगा घर सोडून गेल्यापासून वत्सलेची मात्र रयाच गेली आहे. तिनं कुठं जाणं-येणंच सोडून दिलंय.’
`वत्सलेचे किंवा रुद्रेशचे आई-वडील इथं असते तर मुलगा इतका हाताबाहेर गेला नसता असं वाटतं.’
`वय झालेलं कोण अखेरपर्यंत इथं राहायला येणार? तुम्ही याल? इथंच कायम राहाल? हेच सगळ्यांच्याही बाबतीत होतं. ते बिदरचे जमीनदार. तिथलं घर-शेत सोडून इथं कशाला येतील? रुद्रेशचे आई-वडील तर इथं येऊन जायलाही तयार नाहीत. तिथं असलेल्या मुलगा-सुनेशी त्यांचं व्यवस्थित पटतं. त्या सुनेवर त्यांचं मुलीसारखं प्रेम आहे. इथली ही सून कामावर निघून गेली की त्यांनी दिवसभर काय करायचं?’
`वत्सला घरातच असती तर असं झालं नसतं की काय कोण जाणे!’
`तसंही म्हणता येणार नाही. वत्सलेची मन:स्थितीही आपण समजू शकतो. परदेशातला जावई मिळतो म्हटल्यावर लग्न लावून दिलं जातं. पण प्रत्यक्ष मुलीची काय इच्छा आहे हे पाहिलं जात नाही. आपल्या समाजात मुलीही ठामपणे आपला विरोध व्यक्त करत नाहीत. ती इथंच जन्मली असती तर हवं तसं शिक्षण घेऊन मनाचं समाधान होईपर्यंत नोकरी करून त्यानंतर तिनं लग्न केलं असतं. मूल झाल्यावर चार-सहा वर्षं नोकरी सोडून घरी राहिली असती. नंतर पुन्हा नोकरी केली असती. पण आपल्या देशातून आलेल्या वत्सलेच्या मनात सतत अस्थैर्याची भावना असते. अगदी मुळंच रोवली आहेत तिच्या मनात! बघा ना सगळं कसं होऊन बसलंय!’
पद्मा या देशातली सुख-दु:खं आणि रीति-नीतिविषयी विस्तारानं सांगत होती. तिच्याशी बोलताना गौरम्मांना कितीतरी गोष्टी समजत-उमजत होत्या.
`असं असेल तर पद्मा, तू का भारतात यायचा विचार करत नाहीस? तुला राग नाही येत ना माझ्या बोलण्याचा?’
`नाही. हा प्रश्न मी स्वत:ही स्वत:ला अनेकदा विचारला आहे.’
`मग? का येत नाही?’
`मला माझ्या सासरचं घर मुळीच आवडत नाही. माझ्या सासूबाई सोवळ्या-ओवळ्याच्या नावाखाली प्रचंड वैताग देतात. राजीव हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही भारतात परतलो तर आम्हांला एकत्रच राहावं लागेल. त्यांच्या दृष्टीनं आम्ही श्रेष्ठ! कुणातही मिसळायचं नाही. महिन्याची अडचण आली की तीन दिवस बाहेर! शिवाय तिथं आम्हाला ढीगभर नातेवाईक आहेत. तिथं गेल्यावर आमचं घर, घर न राहता, धर्मशाळा होऊन जाईल! माझी आई एका कॉलेजची प्रिन्सिपॉल आहे. आम्हाला तिनं भरपूर शिक्षण दिलं. माझी छोटी बहीण इंग्लंडमध्ये डॉक्टर आहे. तिनं पंजाबी तरुणाशी लग्न केलं आहे. भाऊ दिल्लीत असतो. त्यानं तमिळ मुलीशी लग्न केलं आहे. माझी आई कुणावर कसलंही दडपण आणत नाही. तिथं सोवळ्या-ओवळ्याचं नावही नाही. अशा घरातून मी आले! आणि मला असल्या सासूबरोबर राहावं लागेल! तुम्हीच सांगा, हे कसं जमेल?’
`तुझ्या सासूबाई इथं आल्या नाहीत?’
`विकासच्या जन्माच्या वेळी तिकीट पाठवतो- या म्हटलं तर म्हणाल्या, सप्तसागर ओलांडायचे म्हणजे गोमुत्र आणि गंगाजलानं शुद्धी व्हायला हवी. विमानातून न्यायला देतील काय? शेवटी राजीवनंच नको म्हणून कळवलं.’
सारे ऐकता-ऐकता गौरम्मांच्या अज्ञानाच्या अंधारात प्रकाश-किरणांचा प्रवेश होत होता. त्या किरणांमुळे त्यांना अमेरिकेतील कुटुंबांच्या समस्यांची जटिलता नजरेसमोर येत होती.
प्रत्येकाची स्वतंत्र अशी एकेक समस्या दिसत होती आणि त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच दिसत होती.
`इथं किती वर्षं राहणार आहात?’ गौरम्मांनी विचारलं.
पद्मा म्हणाली, `कायम इथंच राहायचं आता! माघारी जायचं नाही. मुलं मोठी झाली की इथल्यासारखीच होतात. मुलं वेगळी राहायला लागतात. त्याला उद्धटपणा म्हणत नाहीत. पिल्लाचे पंख बलिष्ठ झाले आहेत, त्याला स्वातंत्र्य हवं-असं त्याकडे बघितलं जातं. आई-वडील कितीही श्रीमंत असले तरी मुलं कुठं तरी नोकरी करून पैसे मिळवतात आणि स्वत:चं शिक्षण घेतात. आपल्यासारखे ते आई-वडिलांच्या संपत्तीत वाटा मागत नाहीत.’
गौरम्मा चकित झाल्या. `होय? आणि आई-वडील म्हातारे झाल्यावर?’
`वृद्धाश्रमात राहतात. त्यांच्या वयाच्या वृद्धांबरोबर राहतात. बहुतेक वेळा आपली मिळकतही अशाच आश्रमांना देऊन टाकतात.’
गौरम्मांना विनितेची आठवण झाली. स्तनात गाठ आली तेव्हा मुलीसारखी तिनं आपली सेवा केली! त्या वेळी तिनं आपल्यासाठी गोकर्णाची ट्रीपही कॅन्सल केली होती.
कुठं आपलं घर आणि कुठं वृद्धाश्रम! त्यांना तीव्रपणे बेंगळूरच्या आपल्या घराची आठवण झाली.
त्याच रात्री पद्माच्या पोटात दुखू लागलं. खरं तर बाळंतपणाची तारीख आणखी आठवड्यावर होती. पण तेवढा वेळ जाण्याची लक्षणं नव्हती.
गौरम्मा उठल्या तेव्हा पद्मा विव्हळत आपली किट्-बॅग भरत होती. गौरम्मांनी पुढं होऊन म्हटलं, `दे इकडं. मी भरते.’
`नको. मीच भरते. म्हणजे कुठं काय आहे ते माझं मला सापडेल.’
तरीही तिचं विव्हळणं सुरच होतं. न राहवून गौरम्मा म्हणाल्या, `कुणाला तरी फोन करून बोलावून घे. हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायला सांग.’
`मी हॉस्पिटलच्या अँम्ब्युलन्सला फोन केला आहे. एवढ्यात येईल.’
गौरम्मांनी आपल्या पद्धतीनं सांगितलं, `तू आपली कमरेवर आणि ओटीपोटावर गरम पाणी घे. तेवढीच लवकर सुटका होईल.’
`नको-नको! हॉस्पिटल बरंच लांब आहे. त्यामुळे थोडा वेळ लागला तर हवाच आहे.’
तिच्या वेदनेने व्याकूळ झालेल्या गौरम्मा म्हणाल्या, `थांब, तुला कॉफी करून देते, की कषाय करून देऊ?’
`नको. डॉक्टरांनी सांगितलंय काहीही प्यायचं नाही.’
गौरम्मांना पुढं काय बोलावं ते सुचेना. त्यांचा एवढ्या वर्षांचा अनुभव इथं निरुपयोगी ठरत होता. त्यांच्या भारतात अत्यंत मौल्यवान वाटणाऱ्या अनुभवाच्या सूचना इथं निष्प्रभ ठरत होत्या. त्यांनी देवापुढे दिवा लावला आणि मनापासून प्रार्थना केली, `देवा, पद्माची आणि पोटातल्या बाळाची सुखरूपपणे सुटका कर!’
`पद्मा, आणखी कुणाला फोन करू का?’
`नको. डिलिव्हरी झाल्यावर मीच तुम्हाला फोन करून कळवेन.’
अँम्ब्युलन्सचा आवाज ऐकून पद्मा बाहेर आली. निघताना ती गौरम्मांना म्हणाली, `देवापुढच्या दिव्याकडे लक्ष ठेवा! हे लाकडी घर आहे!’
`पद्मा, तू घराविषयी किंवा मुलाविषयी अजिबात काळजी करू नकोस. निश्चिंत मनानं जाऊन ये!’ त्यांनी सांगितलं.
त्या वेदना सहन करतानाही मंद हसत पद्मा निघाली.
हे सगळंच गौरम्मांच्या दृष्टीनं विचित्र होतं. बाळंतपणाच्या वेळी घरातल्या आणि शेजारपाजारच्या प्रौढ स्त्रिया त्या तरुणीला कितीतरी प्रकारे मदत करतात हे त्यांना ठाऊक होतं.
सासवा-सुनांमध्ये एरवी कितीही तेढ असली तरी सुनांच्या बाळंतपणाच्या वेळी रात्रभर सासवा हॉस्पिटलात जाग्या बसून राहतात!
एवढ्या समृद्ध देशामध्ये गर्भारशी कशी अनाथ असल्याप्रमाणे एकटीच दवाखान्यात गेली! तिच्या सोबत जाण्यासाठी कुणालाही वेळ नाही. सगळे आपापल्या कामात गढले आहेत. कामात गढून जाणं याच गुणामुळे हा देश एवढा पुढे गेला आहे. पण याच एकलेपणामुळे अनेक मनोरुग्णही झाले आहेत. एकाच देशाचे दोन चेहरे हे!
त्या विकासच्या शेजारी झोपल्या असल्या तरी त्यांचं मन जड झालं होतं. कारण त्यांनी कितीही नको म्हटलं तरी विनितेच्या बाळंतपणाची आठवण त्यांच्या मनात घेरून टाकत होती.
बाळंतपणासाठी विनिता धारवाडला गेली होती. त्या वेळी आपण तरी तिला `इथंच थांब. मी बाळंतपण करते’ म्हणून आश्वासन दिलं नव्हतं. सुरभीच्या लग्नाचं निमित्त असलं तरी जमुनेनं मन व्यापून टाकल्यामुळे आपण तसं वागल्याचं आता मन स्पष्टपणे सांगत होतं.
एवढ्यात पद्माचा फोन आला. आठवणींमधून स्वत:ला बाहेर ओढून त्यांनी फोन उचलला.
`मुलगा झालाय. दोघंही छान आहोत. नॉर्मल डिलिव्हरी. एव्हाना राजीवला आणि चंद्रूला कळवलंय मी.’
`मी केव्हा येऊ? दुपारी की रात्री?’
`मी टॅक्सी ठरवली आहे. संध्याकाळी ती घरी येईल तेव्हा विकासला घेऊन या. विकासलाही त्याला भाऊ झाल्याचं सांगा.’
पद्मा आणि राजीव यांना बरेच मित्र-मैत्रिणी असल्याचं गौरम्मांना ठाऊक होतं. पण आज वर्किंग-डे असल्यावर ते कसे येतील? इथं काही आपल्यासारखी भरपूर रजेची सोय नसते. वर्षाकाठी केवळ दहा दिवस रजा असते. आपल्या कुटुंबातल्या अडीअडचणी आणि भारतात जाणं यासाठी ती अत्यंत सांभाळून वापरावी लागते.
जर पद्मा शनिवारी किंवा रविवारी बाळंत झाली असती तर कदाचित सगळे स्नेहीजन तिच्या मदतीला आले असते!
तिसऱ्या दिवशी पद्मा छोट्या विनितबरोबर घरी आली. गौरम्मांनी आरती ओवाळून तिचं आणि बाळाचं स्वागत केलं. थोड्याच वेळात पद्मा त्यांना घरकामात मदत करण्यासाठी आली तेव्हा गौरम्मांनी तिला सांगितलं,
`इथं ही गोष्ट सर्वसामान्य मानली जात असेल, सगळे असंच वागत असतील- पण मी इथं असेपर्यंत तू काम करू नकोस. ओल्या बाळंतिणीनं काम करणं मला तर बघवत नाही.’
जमुनाचा फोन आला, `आणखी दोन दिवसांत राजीव येणार म्हणून समजलं. इथं मलाही खूप ताण पडतोय. लवकर याल का?’
पद्माला घरी येऊन आठ दिवस झाले होते. पद्माही म्हणाली, `खरंय! जमुनाला किती त्रास होत असेल याची मला कल्पना आहे. तुम्ही इतके दिवस थांबून माझं बाळंतपण केलं. तुम्ही कितीही दिवस राहिलात तरी मला हवंच आहे!’
गौरम्मा निघाल्या. पद्मानं त्यांना तीनशे डॉलर दिले. त्यांनी कितीही नको म्हटलं तरी ती म्हणाली, `बेंगळूरला गेल्यावर एक छान साडी घ्या. त्या वेळी माझी आठवण काढाल काय?’
पद्माला भावनावेग अनावर झाला. गौरम्मांनाही रडू आलं. गेल्या काही दिवसांत त्यांचे तिच्याशी दृढ स्नेहसंबंध जुळले होते.
या वेळी हरबऱ्याची डाळ लवकर संपली होती. कदाचित आल्या-गेल्यांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार झाल्यामुळे! आधी जमुना कामावर जायची, नंतर चंद्रूच्या जाण्याची वेळ होती.
गौरम्मांनी सांगितलं, `चंद्रू, तू येताना हरभऱ्याची डाळ आणशील काय? उडदाचीही डाळ तू घेऊनच ये. थोडीच राहिली आहे.’
`अम्मा, माझा ऑफिसचा रस्ता आणि इंडियन स्टोअरचा रस्ता वेगवेगळा आहे. पण गुरुवारी माझं इंडियन स्टोअरच्या रस्त्यावर काम असतं. तू लिस्ट कर.’
नंतर तो म्हणाला, `अम्मा, तूही बरोबर चल. म्हणजे तुला हवं ते सामान घेता येईल.’
`मानसीला घरात ठेवून बाहेरुन कुलूप लावून जायचं काय? नाही तरी ती झोपली आहे.’
`बाप रे! असं करणं या देशात कायद्यानं गुन्हा आहे! मुलांना घरात एकटं ठेवायचं नाही.’
`मग काय करायचं?’
`माझी मिटिंग फक्त तासाभराची आहे. तू तुझी खरेदी उरक. त्यानंतर तुम्हाला मी घरी आणून सोडेन.’
`तुलाच उलट-सुलट फेरा पडेल ना! ड्रायिंव्हगही भरपूर होईल.’
`अम्मा, अमेरिकेत दहा-पंधरा मैल म्हणजे काही फार अंतर नाही.’
बाँबे ग्रोसरी छोटंसं दुकान होतं. मागं चित्राबरोबर त्या एकदा आल्याचं त्यांना आठवलं. याहून मोठी किराणा मालाची दुकानं इतर मोठमोठ्या गावांत होती. काही ठिकाणी तर `लिटिल इंडिया’ म्हणून वेगळा विभागही होता. भारतीय साड्या, सलवार-कमीज, दाग-दागिने, बांगड्या, खाद्यपदार्थ मिळणारी मोठमोठी दुकानं! पण घाई-गडबडीत काही हवं असेल तर मात्र जवळपासचे भारतीय याच दुकानात यायचे. हेही दुकान चाललं पाहिजे ना!
मानसी प्राममध्ये झोपली होती. गौरम्मा सामानाची यादी घेऊन काउंटरपाशी आल्या. त्यांना इंग्लिश थोडं-फार समजत होतं. पण सावकाश बोललं तर! यादी कन्नडमध्ये होती.
`चंद्रू, उडदाच्या डाळीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे?’
काउंटरजवळ उभ्या असलेल्या बाईच्या हे कानावर गेलं. ती म्हणाली, `मला कन्नड येतं. इकडं या!’
चंद्रूला हसू आलं. कन्नड भाषा कानावर पडताच गौरम्मांचा चेहरा सुपाएवढा झाला. अरे! इथंही कन्नड बोलणारं भेटतं ना!
`मग मला काळजी करायचं कारण नाही. मी निघतो. येईन तासाभरानं.’ असं सांगून चंद्रू निघून गेला.
सकाळची दहाची वेळ होती. वारही सुट्टीचा नव्हता. त्यामुळे गर्दी बेताचीच होती. असलेली एक-दोन माणसंही निघून गेल्यावर दुकानात दोघीच राहिल्या.
गौरम्मांनी आपलेपणानं हसत विचारलं, `तुमचं नाव?’
`माझं नाव आशा पाटील. मी कोल्हापूरची. माझी आई अक्कलकोटची. त्यामुळे कन्नड येतं. फारशी सवय नाही. त्यात मराठी मिसळलेलं कन्नड आमचं.’
गौरम्मांना यातला फारसा तपशील समजला नाही. तरी त्या म्हणाल्या, `कुठली का असेना, कन्नड भाषा आहे ना!’ त्यांच्या आवाजातला आनंद लपत नव्हता.
`या बसा. चहा करते.’
ही आशा पाटील पस्तिशीची असावी. चुणचुणीतपणा तिच्या प्रत्येक हालचालीतून दिसत होता. गौरम्मा चकित होऊन तिकडे पाहत होत्या. एकीकडे कॉडलेस फोन घेऊन चहा करणं, काउंटर पुसणं, गणेशाच्या चित्राभोवती उदबत्ती ओवाळणं चाललं होतं.
गौरम्मांच्या यादीप्रमाणे आशानं पटापट सामान बांधून दिलं. केवळ पंधरा मिनिटांत सगळं काम झालं.
गौरम्मांच्या मनात कुतूहल दाटून आलं-ही एकटी बाई कसं काय दुकान सांभाळते?
त्यांनी विचारलं, `एक विचारू? राग मानणार नाहीत ना?’
निवांतपणा असल्यामुळे आशाही म्हणाली, `विचारा.’
`तुम्ही एकट्याच दुकान आणि घर कसं काय सांभाळता?’
आशा खदखदून हसली.
`माझं लग्न झालंय. नवरा दोन वाजता येईल. मग मी घरी जाते. खाद्यपदार्थ तयार करते.’
`म्हणजे?’
`इथं तुम्ही पाहताय ना? या पातळ चपात्या मी स्वत: घरात करते. दररोज शंभर-दोनशे, किंवा ऑर्डर असेल तशा करते. समोसे करते. कटलेट करते.’
`भरपूर कष्ट आहेत ना?’
`आहेत. पण फुकट काय मिळतं जगात? कुठं तरी कष्ट करावेच लागतात.’
`होय. तेही योग्यच आहे म्हणा! तुम्हाला इथं येऊन किती वर्षं झाली?’
`दहा वर्षं होऊन गेली बघा!’
`भारताची आठवण येत असेल ना!’
`आठवण येते-पण तिथं जावंसं वाटत नाही.’
`का?’
`दहा वर्षांत एकदाही गेले नाही. माझे आई-वडील एकदा येऊन गेले.’
अपरिचितांपुढे आपल्या आयुष्याविषयी काय सांगायचं असा विचार करून आशा गप्प झाली. गौरम्माही गप्प बसल्या. एवढ्यात चंद्रूही आला. निघताना आशानं भारतीय इंग्लिशमध्ये चंद्रूला सांगितलं, `तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या आईला घेऊन या.’
पुढं हीच पद्धत पडली. दर गुरुवारी चंद्रू त्यांना बाँबे स्टोअर्समध्ये उतरवू लागला. काही विकत घ्यायचं असो वा नसो, गौरम्मा आशाबरोबर गप्पा मारत बसायच्या.
हळूहळू त्या दोघींचा स्नेह जुळला. दोघींनाही एकमेकींचे स्वभाव आवडले.
एकदा गप्पा मारताना आशा म्हणाली,
`तुम्ही मागं विचारलं होतं, आम्ही इंडियाला का गेलो नाही म्हणून!’
`होय. पण मी तुम्हाला मनस्ताप दिला असावा हे विचारून! कारण तुम्ही त्यावर काहीच उत्तर दिलं नाही.’
`तसं नाही. माझी कथाच वेगळी आहे. सगळ्यांसमोर काय म्हणून सांगू? म्हणून गप्प राहिले.’
`मीही आग्रह केला नाही.’
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

`आता सांगते. आई अक्कलकोटची आणि वडील सांगली-कोल्हापूरकडचे. तालुक्याच्या गावात आम्ही राहत होतो. धड शहर नव्हे, धड खेडं नव्हे अशा गावात. घरात कन्नड बोलत होतो आणि घराबाहेर मराठी. लिहिणं-वाचणं मराठी.’
`असू दे! कुठली भाषा झाली म्हणून काय झालं?’
कथेचा धागा पकडून ती पुन्हा सांगू लागली,
`मी फक्त मॅट्रिक झाले होते. माझ्या पाठीवर दोन भाऊ होते. घरची परिस्थिती अगदीच सामान्य. गावातल्याच एका गौड घरातलं स्थळ आलं. मुलाचा मुंबईला स्वत:चा धंदा आहे म्हणून सांगितलं होतं. मुंबईला चौकशी करणारं कुणीच नव्हतं. ते बघायला आले. मुलगा काही फार बोलला नाही. मीही बोलले नाही. पंधरा दिवसांच्या आत लग्न झालंदेखील!’
`तुमच्या यजमानांचं नाव?’
`अशोक पाटील. मी मुंबईला गेले. तिथं पाहिलं तर काय! चाळीत एवढंसं घर. घरात भरपूर माणसं. दोन नणंदा. दुष्ट राक्षसिणीसारखी सासू. तोंडाला येईल तसा, आरडा-ओरडा करणारा सासरा, आईच्या कह्यात असणारा नवरा.’
तिच्या चेहऱ्यावरचं चिरंतन हास्य नाहीसं होऊन त्यावर विषाद दिसत होता.
`मी खेड्यात वाढले होते. शेत-मळा, मोठी-मोकळी जागा आणि घर. स्फटिकासारख्या पाण्याची परसात विहीर. थंडगार निंबाच्या झाडाखाली वाढले मी. तिथलं खुराड्यासारखं घर, सतत किंचाळणारा रेडिओ-टी.व्ही. घरात सुनेचं स्थान मोलकरणीचं. नवऱ्याबरोबर चार शब्द बोलायची सोय नाही.’
`तुमचे यजमान कसला धंदा करायचे?’
`छोटीशी चहा-पावाची हातगाडी होती. त्यालाच `बिझनेस’ असं गोंडस नाव दिलं होतं! आपल्या देशात कुणाच्याही शब्दावर विश्वास ठेवू नये बघा! हजार खोटं बोलून एक लग्न ठरवावं म्हणतात- पण एवढं दुसरं कुठलंही पाप मोठं नाही असं मला वाटतं.’
गौरम्मांच्या मनात सुरभीच्या लग्नाची आठवण तरळून गेली.
`मला तर माहेरीही गाढवासारखं राबायची सवय होती. तरीही इथं दिवस-दिवस राबून कामंच संपत नव्हती. माझ्या राक्षसिणी नणंदा माझ्या साड्या नेसून मिरवायच्या आणि वर मलाच शिवीगाळ करायच्या. आता विचार करताना वाटतं, बिचाऱ्या! त्यांचीही लग्नाची वयं झाली होती. घरातल्या परिस्थितीमुळे त्याही बिथरत असतील कदाचित!’
`हं-’
`अशा परिस्थितीत माझ्या विनयचा जन्म झाला. मी कपडे धुताना आणि स्वयंपाक करताना एकच स्वप्न बघत होते. माझं घर असावं, त्यात आम्ही दोघं आमची मुलं. आईसारखी प्रेम करणारी सासू, मैत्रिणीसारख्या नणंदा, घराभोवती स्वच्छ हवा आणि हिरवीगार बाग, शांत वातावरण!’
`पण तुमच्या भोवतालचं वातावरण तर-’
`होय! अगदी माझ्या स्वप्नाविरुद्ध होतं ते. त्यामुळे माझं मन अधिकाधिक स्वप्नातच रमू लागलं. त्यामुळे माझ्या हातून नेहमीसारखं कामही व्हायचं नाही. संतापलेली सासू अनेकदा डोक्यावर भांडी आदळायची.’
गौरम्मांच्या डोळ्यांसमोर ते दृश्य तरळून गेलं. त्याचा प्रत्येक्ष अनुभव घेतलेली आशा सांगत होती.
`सासूच्या छळामुळे माझी स्वप्नं कमी न होता वाढतच राहिली. वास्तव जगात राहण्यापेक्षा स्वप्नांच्या दुनियेतच मी जास्त वेळ राहत होते. मला त्या वेळी कशातही रस राहिला नव्हता. कुणाशी बोलणं नको, स्नेह नको, जेवण-खाण नको! मी आणि माझी स्वप्नं बस्स!’
गौरम्मांना हे आकलन करून घेण्यालाही कठीण होत होतं.
`किती दिवस असं चाललं होतं?’
`किती तरी महिने. तेव्हा माझं माझ्या विनयकडेही लक्ष नव्हतं. एकदा तर सासूबार्इंनी संतापानं मला डागलंदेखील!’ बाही वर सारून आशानं सासूच्या क्रूरपणाचा पुरावा दाखवला.
गौरम्मा घाबरून गेल्या.
सासू-सूनेचं नातं उंदरामांजरासारखं असतं हे त्यांनाही ठाऊक होतं. त्याला स्थल-कालाचं बंधन नाही हेही त्या मानत होत्या. पण तरीही स्त्रीच स्त्रीशी एवढ्या शत्रुत्वानं वागू शकते?
गौरम्मांकडे आशाचं लक्ष नव्हतं. ती आपली कथा पुढं सांगू लागली.
`एकदा माझे बाबा सहज म्हणून मला भेटायला आले. माझी परिस्थिती बघून त्यांचा जीव कळवळला. आमच्या गावचा एक मुलगा डॉक्टर होता. त्याला भेटून ते खूप रडले म्हणे. शेवटी तोच आमच्या घरी आला. माझ्या यजमानांना त्यानं सांगितले, हिला मनोरोग झालाय.’
गौरम्मांच्या भुवया उचलल्या गेल्या. `होय?’
मनोरुग्ण म्हणजे वेड एवढंच ठाऊक असल्यामुळे त्यांची ती प्रतिक्रिया होती.
`पण माझ्या यजमानांनी माझ्या बायकोला काहीही झालं नाही असं सांगून त्याला पिटाळून लावलं.’
`पुढं?’
`पुढं काय! दररोज कोपऱ्यात रडत बसणाऱ्या बायकोला बघून तेही कंटाळले. शिवाय बायकोचा कामालाही उपयोग होईनासा झाला ना! मग सासूही आरडा-ओरडा करू लागली. आपल्या सरकारनं एकच बायको करायचा कायदा केला ते बरं झालं! नाहीतर एवढ्या अवधीत मला नक्की सवत आली असती!’
`अय्यो!’
`शेवटी पुन्हा एकदा बाबा आले आणि मला तीन मुलं आहेत असं समजून हिला कायमची सांभाळेन असं सांगून मला माहेरी घेऊन आले. मेंटल हॉस्पिटलमध्येही दाखवलं.’
`लवकर गुण आला?’
`लवकर कसला? दोन वर्षं लागली त्यासाठी. औषधं, गोळ्या एक-ना दोन! डॉक्टरांनी सांगितलं, सगळंच हिच्या मनाविरुद्ध होत गेल्यामुळे ही अशी झाली आहे. हिला पुन्हा सासरी पाठवू नका, म्हणूनही त्यांनी सांगितलं. मी आणि विनय माहेरीच राहू लागलो.’
`मग इथं कशा आला?’
`आमच्या बाबांचे एक गुजराथी मित्र होते. त्यांना न्यूयॉर्कमध्ये किराणा मालाचं दुकान आणि हॉटेल काढायचं होतं. विश्वासू जोडप्याची त्यांना गरज होती. स्वयंपाक करावा लागणार होता. हिशेबही पाहायचा होता. माझे बाबा मला आणि माझ्या यजमानांना पाठवायला तयार झाले.’
`तुमचे यजमान तयार झाले?’ त्यांनी आश्चर्यानं विचारलं.
`तयार नसायला काय झालं? त्यांनाही डॉलर म्हणजे काय हे ठाऊक होतंच. माझी खडूस सासूही मला `तूच आमच्या घरची भाग्यलक्ष्मी’ म्हणू लागली!’
`आणि तुम्ही?’
`माझं मन पूर्णपणे कोमेजून गेलं होतं. नवऱ्याला सोडायची तर इच्छा नव्हती. दुष्ट सासूच्या हातून सुटका करून घेण्याची सुसंधी वाटली मला ती! देवानंच हा मार्ग दाखवला असं वाटलं मला.’
`भीती वाटली नाही?’
`भीती कसली? एकदा त्या मनोरोगातून फिरून आल्यावर काहीही वाटेनासं झालं होतं. एकदाचे इथं आलो. आमच्या बाबांनी त्यासाठी किती कर्ज काढलं, किती कष्ट काढले, ते सारं पाहिलं तर त्यापुढे माझे कष्ट काहीच नाहीत! माझ्या भावांनी आपल्या वाट्याची जमीन गहाण टाकली!’ भावनावेगानं आशाला हुंदका आला. गौरम्मांनी अनुकंपेनं तिला थोपटलं.
भावनावेग आवरुन ती म्हणाली,
`आणि इथं कुणी आमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडून वाट पाहत नव्हतं. न्यूयॉर्क म्हणजे आपलं मुंबईच म्हणा ना! शरीर स्वयंपाकघरात शिजून निघत असलं तरी मन मात्र शांत होतं. अतिशय कष्टानं एकेक डॉलर साचवू लागलो! एकदाही त्या न्यूयॉर्कमधून बाहेर पडलो नाही. प्रत्येक डॉलर आणि पगार साचवून बाबांना, शेत सोडवून घेण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी पाठवत राहिले.’
`तुमचे यजमान गप्प होते?’
`अशोक? आईजवळ असताना आईचं लेकरू होतं. आता बायको बरोबर असताना बायकोचा नवरा! माझं सगळं तो ऐकू लागला. तीन वर्षांत आम्ही सारा व्यवहार शिकून घेतला. त्यानंतर आम्हाला घेऊन आलेल्या गुजराथी भार्इंना आम्ही वेगळे होऊ म्हणून सांगितलं.’
`ते रागावले असतील!’
`राग आल्याशिवाय कसा राहील? पण मीच त्यांना नीट पटवून सांगितलं, `तुम्ही आमच्या दृष्टीनं प्रत्यक्ष देव आहात. पण आम्हीही आमचं जीवन जगायला हवं की नाही?’ त्यांनाही ते पटलं. अजूनही आम्ही न्यूयॉर्कमधल्या त्यांच्या दुकानातूनच सामान आणतो. इथं जया म्हणून आहेत ना, त्यांच्या घरी गुढीपाडव्याच्या पूजेच्या वेळीही मी स्वत: यादी तयार करते आणि सामान आणून देते. आम्ही व्यापारात फसवणूक करीत नाही. हे लहान गाव आहे. लगेच नाव बिघडतं. शिवाय फसवणुकीनं कुणी फार मोठाही होत नाही. त्या आकाशातल्या शंकरानं द्यावं, आपण ते झोळीत घ्यावं!’
`आता कसे आहात?’
`फारच छान! देवानं आम्हांला काहीही कमी केलं नाही. आम्ही काही गडगंज श्रीमंत नाही. तरी आमचं छोटंसं घर आहे. घरापुढे बाग आहे. विनय मोकळ्या हवेत खेळतो. माझं ऐकणारा नवरा आहे. सासरचा त्रास नाही. मला त्यानंतर कधीही डिप्रेशन आलं नाही. माझ्या छोट्या घराची मीच मालकीण आहे!’
`आता तुमच्या सासूबाई काय म्हणतात?’
`पैसा पाहिला की लाळ घोटणाऱ्यांची जात त्यांची! सारख्या म्हणायच्या, तुझ्या दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी मी येईन. आम्ही त्यांना कधीच बोलावून घेतलं नाही. हं! नणंदांच्या लग्नाच्या वेळी मात्र पैसे पाठवले. त्यांचं पत्र आलं तर पाकीटही न फोडता केराच्या टोपलीत टाकून देते. मला मात्र हा देश म्हणजे स्वर्ग वाटतो!’
तिच्या बोलण्यात सरळपणा होता. तिच्या आवाजातून पदोपदी जीवनाचा उत्साह दिसत होता. तिचा तरतरीतपणा तिच्या हालचालीतून दिसत होता.
गौरम्मा तिच्याकडे लक्ष देऊन पाहत होत्या.
`मी भारतातच राहिले असते तर आतापर्यंत वेडी झाले असते किंवा आत्महत्या करून मोकळी झाली असते! कदाचित सासूचा जीवही घेतला असता! मला ठाऊक आहे, माझ्यासारख्या लक्षावधी बायका तिथं आजही असतील. सासूच्या छळानं विटून जाऊन मरत असतील. सगळ्यांचं माझ्यासारखं सुदैव कुठून असणार? अरुणभाई गुजराथींच्या रूपानं माझ्या आयुष्यात देव आला. मी इथं आल्यानंतर बाबांचं सारं कर्ज फिटलं, माझ्या नणंदांची लग्न झाली, माझा मनोरोग कुठल्या औषधाशिवाय नाहीसा झाला!’
`तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाची काळजी नाही वाटत?’
`नाही कशी? ती काळजी सगळ्यांनाच आहे. पण मुंबईमधल्या चाळीत राहणाऱ्या मुली इथल्या मुलींपेक्षा फास्ट असल्याचं मीही पाहते. काहीही झालं तरी मी पुन्हा तिथं जाणार नाही!’
चंद्रूच्या गाडीचा आवाज आला. गौरम्मा उठल्या.
`फार लांबड लावली मी! कंटाळा आला?’
`नाही. डोळे उघडल्यासारखे झाले!’ गौरम्मा म्हणाल्या.
गौरम्मांनी त्याआधी कधीही जमुनाच्या बेडरुममधला वॉर्डरोब उघडला नव्हता. कुणाच्या न कळत असले उद्योग करण्याइतका हलकेपणा त्यांच्या स्वभावात नव्हता.
त्या दिवशीही चंद्रूनं ऑफिसला जाता-जाता सांगितलं होतं, `अम्मा, शर्टचं बटण लावून ठेवशील? वॉर्डरोबमध्ये शर्ट ठेवलाय-’
सतत काम करायची आवड असल्यामुळे गौरम्मा दुपारी काही ना काही काम शोधत असायच्या.
चंद्रूचा शर्ट काढण्यासाठी त्यांनी वॉर्डरोब उघडला आणि तिथं कोपऱ्यात ठेवलेला फोटोंचा अल्बम खाली पडला. त्यांनी तो सहजच उचलला आणि पाहू लागल्या.
तो चंद्रू आणि जमुनाच्या लग्नानंतर लगेच काढलेल्या फोटोंचा अल्बम होता. वेगवेगळ्या गावी ते फिरून आले होते. गौरम्मांना त्याचंही बरंच कौतुक होतं.
अल्ब चाळता-चाळता एका फोटोनं त्यांची नजर खेचून घेतली. नायगरा फॉल्सच्या समोरचा तो फोटो होता. त्या फोटोतल्या जमुनाच्या अंगावरच्या साडीनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
सुरभीच्या लग्नात जमुनानं तिला पाच साड्या भेट दिल्या होत्या, त्यांत या साडीचा समावेश होता. होय. त्यांनी आणखी निरखून पाहिलं- नेसलेली साडी तिनं भेट म्हणून- तीही लग्नाचं प्रेझेंट म्हणून दिली होती.
गौरम्मांनी तिथं असलेले सगळे अल्बम बाहेर काढून प्रत्यक्ष फोटो लक्ष देऊन पाहिला. त्यांना वेगळाच शोध लागला. हीच नव्हे, जमुनानं भारतात आणून दिलेल्या सगळ्या साड्या, या ना त्या फोटोत तिच्या अंगावर झळकत होत्या.
अमेरिकेतल्या साड्या विटत नाहीत, कितीही वेळा नेसलं तरी चुरगळत नाहीत, भोकं पडत नाहीत. त्यामुळे जुनी साडी आणि नवी साडी यातला फरकही कळत नाही. जमुना इथं साड्या नेसून नंतर भारतात येताना त्याच साड्या `या मी तुमच्यासाठी आणल्या आहेत’ असं सांगून देत होती.
हेच सत्य समजून गौरम्माही डॉलर सुनेचं भरपूर गुणगान करत होत्या!
आता मात्र गौरम्मांचं मन कडवट बनलं. नेसलेली साडी एकमेकींना देण्यात गैर नसेलही. पण लग्नासारख्या शुभप्रसंगी देऊन फसवणूक करणं योग्य नव्हे.
जमुनानं चलाखपणे ही फसवणूक केली होती.
आता हा विषय काढून विचारायला गेलं तर ती म्हणेल, `सुरभीला मी माझी बहीणच मानते. त्यामुळे मी एकसारख्या दोन साड्या घेतल्या होत्या.’
`तर मग तुझी साडी दाखव’ म्हटलं तर म्हणेल `आईकडची जुनी मोलकरीण सारखी साडी मागत होती- तिला दिली मी!’
गौरम्मांना आणखीही आठवलं.
`कस्टम्स’मध्ये अडचण येऊ नये म्हणून मी जुन्या वापरलेल्या साडीसारखी आणली आहे असंही तिनं सांगितलं होतं. वापरलेलीच साडी असल्यावर पुन्हा हे नाटक करायची काय गरज होती?
गौरम्मांना तीव्रपणे वाटलं- आम्ही गरीब असू. आम्हाला अमेरिकेतल्या वस्तूंविषयी आवड असेल- तरीही जुन्या वापरलेल्या साड्या भेट म्हणून घेण्याइतकी वाईट परिस्थिती मुळीच नाही!
गौरम्मांना वाईट वाटलं. यानंतर जमुना किंवा चंद्रूला काहीही आणायला सांगायचं नाही हे त्यांनी मनोमन ठरवलं.
दर आठवड्याला शनिवारी-कन्नड मैत्रिणी एखाद्या ठिकाणी भेटायची जमुना आणि तिच्या मैत्रिणीची पद्धत होती. या शनिवारी मैत्रिणीच्या गप्पा जमुनाच्या घरी ठरल्या होत्या. सगळ्याजणी काही ना काही खाद्दपदार्थ करून घेऊन यायच्या. चार-पाच तास एकत्र राहून गप्पा, गाणी वगैरे करून करमणूक करून घ्यायच्या आणि आपापल्या घरी निघून जायच्या. या गप्पा फक्त बायकांच्याच असत.
जमुनानं सासूला `तुम्हाला हवा तो खाद्दपदार्थ करा’ असं सांगून मोठीच मोकळीक दिली होती! पण अलीकडे गौरम्मा मात्र सारं तिलाच विचारुन करायच्या. का कोण जाणे, अलीकडे त्यांना `हे आपलं घर नाही- जमुनाचं आहे’ हे तीव्रपणे जाणवत होतं.
गौरम्मांनी शेवयाचं उप्पिट आणि वडे करून दिले. प्लेटीची तयारी करणं आणि चहा-कॉफीची व्यवस्था करणं जमुनाचं काम होतं.
या मुलींमध्ये आपलं काय काम, असा विचार करुन गौरम्मांनी मानसीला प्रॉममध्ये घातलं आणि त्या फिरायला बाहेर पडल्या. नऊ-दहा महिन्यांची मानसी आता मुकाट्यानं बसून न राहता भरपूर दंगा करायची. गौरम्माही थोड्या अस्वस्थच होत्या. इथं येऊन खूपच दिवस झाले असं वाटून त्यांना पुन्हा-पुन्हा बेंगळूरच्या आपल्या घराची आठवण येत होती.
गौरम्मांना फिरायला जायचा उत्साह वाटेना, तेव्हा त्या निम्म्या रस्त्यावरुनच मागं वळल्या. येता-येता मानसीही झोपी गेली.
घरात गप्पांना ऊत आला होता. त्या दाराजवळ आल्या आणि आपला संदर्भ ऐकताच त्या थबकल्या. जमुना बोलत होती. तिला गौरम्मांची चाहूल लागली नव्हती.
खरं तर गौरम्मांना चोरुन ऐकायची कधीच सवय नव्हती. आपलं नाव ऐकून त्यांना वाटलं, जमुना कदाचित आपलं कौतुक करत असेल, वर्षभर राहून आपण इथलं सगळं पाहिलं, त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करेल. गावी तिला किती मान मिळतो, त्याविषयी सांगेल-
त्या कुतूहलानं ऐकू लागल्या.
`तुम्ही काहीही म्हणा, तुमच्याइतकं शहाणपण मला नाही हे मी मान्य करते! माझ्या पीएच.डी. चा काहीही उपयोग नाही इथं! तुम्ही सासूचं मन पूर्णपणे काबीज केलं आहे!’ डॉक्टर सुधा मनापासून म्हणत होत्या.
`होय तर! माझ्या सासूनं मला लिहिलेली पत्रं दाखवेन हवं तर! लेकीसमान असलेल्या जमुनास असा त्या मायना लिहितात. तूच तेवढी माझी सून आहेस असंही त्यांनी मला लिहिलंय.’
`हे तर आश्चर्यच आहे! पण तिथं एक सून आहे ना? तरीही या असं लिहितात?’
`छे:! ती सून यांच्या खिजगणतीतही नाही. फक्त रूप काय कामाचं? अगदी गावंढळ आहे ती. भारतातच राहायची लायकी आहे तिची! तोंड मिटून गाढवासारखी राबत असते- तरीही सासूचा तिच्यावर रागच आहे. माझ्यावर मात्र जीव उतू जातो त्यांचा!’
`नणंद कशी आहे तुमची?’
`अगदी आशाळभूत! प्रत्येक पत्रामध्ये अमूक पाठवा- तमूक पाठवा एवढंच लिहिते. तिचा नवराही तसलाच आहे. त्यांची इथं यायची फार इच्छा आहे. तसं स्पष्टपणे बोलून दाखवलेलं नाही. पण मला ठाऊक आहे- त्यानं याचसाठी तिच्याशी लग्न केलंय. पण मी मात्र अजिबात दाद दिली नाही.’
गौरम्मा चकित झाल्या. म्हणजे हिला सुरेशचा प्लॅन ठाऊक आहे तर! सुरेश चटईखाली शिरलाय तर जमुना रांगोळीखाली शिरली आहे!
जमुना पुढं सांगत होती, `कॅमेरा हवा, अमूक हवं, तमूक हवं म्हणून भिकाऱ्यासारखे मागत असतात. म्हणून मी तर पत्रच पोहोचलं नाही म्हणून सांगत असते.’
`त्यांना तुमच्यावर संशय येत नाही?’
`छे:! माझ्यावर त्यांचा पराकोटीचा विश्वास आहे. माझ्या जुन्या साड्या त्यांना नव्या म्हणून भेट देते. शंका येऊ नये म्हणून कस्टमची कथा सांगते. अहो, अमेरिकेचं काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवतात! आमच्या सासूबार्इंचं काय सांगू! खरं तर त्यांना विनितेबरोबर अखेरपर्यंत राहायचं आहे! पण त्यांचा माझ्यावर जास्त विश्वास! तिच्याविषयी बरं-वाईट सांगत असतात मला.’
`अशा आहेत त्या? कठीण आहे!’
गौरम्मा चांगल्याच दचकल्या. डोळे पाण्यानं भरले.
`होय. लग्नाआधीच मी हे ओळखलं होतं. माझ्या वडिलांचा गहाणवटीचा धंदा आहे ना! पैसा देण्याआधी समोरच्या माणसाची पारख करण्याची कला त्यांना अवगत आहे. नाहीतर दिलेला पैसा पाण्यातच जाईल ना! मीही तो गुण घेतलाय. उटीला दोन दिवस माय-लेकी आल्या होत्या. तेव्हाच मला हे समजलं. माझी सासू आहे गावठी आणि नणंद आहे मूर्ख! जाऊ बावळट! इथं माझंच राज्य राहील हे माझ्या लक्षात आलं. त्यात विनितेला माहेरचा आधार नाही. पैशाचं पाठबळ नाही. नवरा बँकेत क्लर्क. वेगळं घर करुन राहायची धमक नाही. या घरात नोकरासारखी राबत असते. मी मात्र सासूशी गोड-गोड बोलते. त्या आल्यापासून मी स्वयंपाकघरात फिरकलेच नाही! त्यांना लाँड्रीही शिकवली आहे.’
`तुम्ही खरं तर कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह व्हायला हवं होतं. प्रत्येकाकडून कशी कामं करवून घ्यायची हे तुमच्याइतकं कुणालाच जमणार नाही!’
`इथला जावई शोधण्यासाठी माझ्या सासूनं खूपच प्रयत्न केले; पण मी मुलगा चांगला नाही म्हणून खोटंच सांगून टाकलं!’
वा किती परोपकारी जमुना! नणंदेचं केवढं कल्याण केलंय हिनं!
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

`ती नणंद इथं आली असती, तर आमच्या संसाराची इतिश्रीच झाली असती! त्यापेक्षा प्रसंगी पन्नास-शंभर डॉलर्स तोंडावर फेकले की नावही होतं आणि नसता तापही टळतो. आता डॉलरचे चाळीस रुपये होतात. भारतातली मंडळी त्याच गुणाकारात रमून जातात!’
`खरंय! तुम्ही म्हणता ते अगदी खरंय!’
`बघा ना! इथं आपल्याला हवं तसं आपण राहत असतो. मुलांना नॉनव्हेज देऊ शकतो. केस कापू शकतो. बियर घेतली तरी कुणी विचारत नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यांचा त्रास नाही. सासू-सासरे आणि म्हाताऱ्या-कोताऱ्यांची सेवा करावी लागत नाही. मला तर असल्या कामाची किळसच येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं असताना आपले नवरेही आपलं ऐकतात. कारण दुसरी सपोर्ट-सिस्टिमच नसते ना!’
`समजा, तुमच्या मिस्टरांनीच भारतात जाऊ या म्हटलं तर काय कराल?’ उमानं जमुनेशी वाद सुरू केला.
`उमा, मी तर यांना सांगितलं, तुम्हाला इंडियात जाऊन सेटल व्हायचं असेल तर व्हा! मी मात्र येणार नाही. तीन वर्षांतून तीस दिवस जाऊन येण्याची पद्धत चांगली आहे. हे अमेरिकेत नोकरी करतात. म्हणून माझ्या वडिलांनी माझं यांच्याशी लग्न लावून दिलं आहे. बेंगळूरमध्ये नोकरी करत असते तर त्यांनी मुळीच दिलं नसतं. माझ्या वडिलांकडून मला मिळणारा पॉकेटमनी यांच्या बेंगळूरमधील पगारापेक्षा जास्त असायचा.’
`तुमच्या सासूबाई केव्हा परत जातील?’
`उमा, आमच्या सासूबार्इंचं काय सांगू! अमेरिका म्हटली की त्यांच्या तोंडून टपा-टपा लाळच टपकते! चंद्रूच्या मनात आपल्या आईला बोलावून घ्यायचं होतं. मी म्हटलं, माझ्या बाळंतपणाच्या वेळी बोलावून घेऊ या. म्हणजे त्यांची हौसही फिटेल आणि मलाही मदत होईल. म्हणून त्यांचा एक वर्षाचा व्हिसा काढला.’
म्हणजे? हिनं मला नोकरासारखं राबवून घेण्यासाठी बोलावून घेतलं आहे तर! ही माझी लाडकी थोरली सून! गौरम्मांना कुणी तरी आसूड ओढल्यासारखं झालं.
यावर उमाही समर्थन करावं तसं म्हणत होती, `खरंय! सगळ्यांचा हिशोब केला तर बेबी-सिटींग, भांडी विसळणं, घर सांभाळणं, स्वयंपाक- तिकिटाचा खर्च कमीच म्हटला पाहिजे! असं कुणी घरात असलं तर चोरीचंही भय नसतं. वा जमुना! काय डोकं आहे तुमचं! एका वर्षात केवढे पैसे वाचवलेत!’
`माझ्या सासूचा हात मात्र ढिला आहे. कुणी थोडं कौतुक केलं की भांडंच रिकामं करते. त्यामुळे मी जास्तीचं सामान डीप-फ्रीजमध्ये काढून ठेवते. अलीकडे सांगते- इथल्या इंडियन स्टोअर्समध्ये खूप महाग मिळतं, मेन स्टोअर्समधून आणून देते.’
डोळ्यांसमोरचा पापुद्रा बाजूला सरून सारं स्पष्ट होत असल्याचा अनुभव गौरम्म्मांना येत होता. सुनेनं आपल्याला राबणारं यंत्र म्हणून वापरलं आहे हे त्यांना उमजलं. यांच्या शनिवारच्या केवळ बायकांच्या गप्पांमध्ये याच प्रकारच्या विषयांवर चर्चा होत असाव्यात.
देवा रे! इतके दिवस अशी कशी मी मूर्ख होते?
त्यांना तीव्रपणे जाणवलं, आपले पती इथं आले नाहीत, हे किती चांगलं झालं! ते आले असते तर ह्या सुनेनं त्यांनाही राबवून घेतलं असतं. आपणही इथं राहता कामा नये. पेज किंवा आंबिल पिऊन राहावं लागलं तरी हरकत नाही- आपण आपल्या हक्क्याच्या झोपडीत राहिलं पाहिजे.
सगळ्या सुना जमुनासारख्या असतात काय? तसं काही नाही. सावित्री किती चांगली आहे. आणि पद्मा? तीही फार चांगली आहे. आपण ज्या घरातली मुलगी आणतो, त्या घरचे गुण त्या मुलीबरोबर आपल्या घरी येतात. म्हणतात ना, सुतासारखी साडी असते आणि आईसारखी मुलगी असते. म्हणूनच मास्तराच्या मुलीशी लग्न करावं म्हणतात हे खरं. त्या मुलींना शिक्षणाचं महत्त्व असतं आणि पैशाची किंमत असते. शामण्णा हे वरचेवर सांगायचे ते अगदी पटलं.
आता स्पष्टपणे त्यांना आठवलं- जमुनाच्या माहेरची श्रीमंती बघून आपले डोळे दिपून गेले होते. मागं-पुढं न बघता ही मुलगी आपण चंद्रूच्या गळ्यांत बांधली ना!
मानसीच्या रडण्याचा आवाज ऐकताच आतलं बोलणं थांबलं. तिला घेऊन गौरम्मा आत आल्या.
थोड्याच वेळात सगळ्या बायका आपापल्या घरी परतल्या. काहीही न दाखवता जमुना हसतमुखानं उठली.
गौरम्मांना रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. त्यांच्या दु:खाला उशी साक्षी होती. पश्चात्तापाच्या फुफाटयात त्या शिजून जात होत्या.
त्यांच्या डोळ्यांसमोर सारखी विनितेची मूर्ती येत होती.
आई-वडील नसलेली पोरकी विनिता त्यांच्या प्रेमासाठी हपापली होती. तिच्या वागण्या-बोलण्यातून ते स्पष्ट दिसत होतं; पण गौरम्मांनी तिकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केलं होतं.
जमुना घरात येण्यापूर्वीचं वातावरण त्यांना आठवलं. त्यानंतर मात्र वातावरण कडवट झालं होतं. आपण विनितेसाठी काहीही केलं नाही हे त्यांना तीव्रपणे जाणवू लागलं. तिच्या लग्नात आपण तिच्यासाठी चांगली साडी घेतली नाही. त्यांनी आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या जमुनेला दिल्या होत्या- पण तिच्या लेखी त्यांची काहीच किंमत नव्हती.
जर आपण त्याच बांगड्या विनितेला घातल्या असत्या, तर तिनं संदर्भ येताच प्रत्येक वेळी सगळ्यांसमोर `आमच्या सासूबार्इंनी दिल्या’ म्हणून सांगत कौतुक केलं असतं. आपण तिच्या बाळंतपणाच्या वेळीही असंच वागलो. त्यामुळे ती धारवाडला निघून गेली. सुरभीच्या लग्नाचा मुहूर्तही अलीकडचा काढता आला असता; पण केवळ जमुनाचा विचार करून आपण लग्न पुढं ढकललं. त्या वेळी आपण विनितेचा विचारच केला नाही.
हाच भेदभाव आपण नातवंडांच्या बाबतीतही केला. हर्षसाठी आपण शंभर रुपये पाठवले होते, तर मानसीच्या बारशाला सोन्याची साखळी केली होती.
आणि डोहाळेजेवणाचंही असंच! विनितेसाठी हिरवा ब्लाऊजपीसही त्यांनी आणला नव्हता. गिरीशचा बेताचा पगार आहे- आपण का साडी आणायची असं त्यांना वाटलं होतं; पण जमुनासाठी हिरवी रेशमी साडी आणली होती. गेल्या जवळ-जवळ वर्षभरात जमुनानं ती साडी अंगालाही लावली नव्हती. तिच्या श्रीमंतीमध्ये त्यांनी साडीसाठी खर्च केलेल्या पाच हजार रुपयांची काहीच किंमत नव्हती!
म्हणजे दुरून डोंगर साजरे म्हणतात ते खरं तर! रंगीत आकर्षक पंख्यामागील काट्या-चोयट्या दिसल्या.
जर मी अमेरिकेला आले नसते तर अशाच अज्ञानात राहून जमुनाचं गुणगान करत राहिले असते!
गौरम्मांना आता या क्षणी निघून जावंसं वाटलं. जवळच मैसूर असतं तर त्या तशा निघूनही गेल्या असत्या; पण अमेरिकेतून तडकाफडकी निघून जाणं शक्य नव्हतं. एखाद्या पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या प्राण्यासारखं त्यांना वाटत होतं.
त्यांनी चंद्रूपुढे प्रस्ताव मांडला, `चंद्रू, कुणी भारतात जाणार असेल तर मीही जाईन म्हणते.’
`का गं?’
`वर्ष झालं घर सोडून! मानसीही आता मोठी झाली. आता तुम्ही दोघंही निश्चिंत मनानं नोकरीवर जाऊ शकाल.’
चंद्रूला आश्चर्य वाटलं नाही, पण जमुना चकित झाली. ती म्हणाली, `एवढ्यात जाणार? एवढ्या लवकर तिथं जाऊन तरी काय करणार? आता तर बेंगळूरमध्ये पाण्याची खूपच अडचण आहे म्हणे. विजेचाही त्रास आहे. कशाला जाता तुम्ही? आपण अण्णांनाच इथं बोलावून घेऊ या. आणखी वर्षभर राहून जा.’
`नको बाई! पाण्याची अडचण असो किंवा आणखी काही असो, आपलं घरच आपल्याला बरं वाटतं! इथं ज्यासाठी आले, ते तर झालंच! सगळं पाहूनही झालं! तुम्हाला आमच्याकडून शक्य तेवढी मदत झाली. आता मला गेलं पाहिजे. आता आम्हा दोघांचंही वय झालंय. इथं काही आजारपण आलं, तर तुम्हालाही उगाच त्रास! आम्ही तिथंच राहणं चांगलं!’
`जमुना, अम्मा म्हणते ते खरंय! तिलाही कंटाळा आला असेल. सोबत मिळाली की अम्माला पाठवून देऊ या.’
त्या दिवशी ऑफिसातून घरी आलेल्या चंद्रूनं विचारलं, `अम्मा, तुझ्या अलमेल आडनावाच्या कुणी मैत्रिणी आहेत काय?’
`त्या आडनावाची कितीतरी कुटुंबं माझ्या ओळखीची आहेत. तू कुणाविषयी सांगतोयस?’
`आमच्या कंपनीत न्यूयॉर्कहून शांता नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनियर आल्या आहेत. बोलता-बोलता त्या म्हणाल्या- तुमच्या आर्इंना अलमेल शांता आठवते काय विचारा!’
`टी नसरीपूरचे अलमेल माझ्या चांगल्या माहितीचे आहेत. श्याम अयंगारांची मुलगी. माझ्याच वयाची असेल ती. तुला आठवत नाही! रामानुज अग्रहारात राहायचे ते. शांता तुझ्यापेक्षा वयानं थोडी लहान असेल. मी तिच्या केसांची नागवेणी घालायची. फार दिवस झाले तिला भेटून. आता कुठं आहे कोण जाणे!’
`मला काहीच आठवत नाही. तूच बोल त्यांच्याशी.’
गौरम्मांना फार आनंद झाला. खेड्यातल्या मैत्रिणीची मुलगी! अगदी लाडक्या मैत्रिणीची मुलगी. रक्ताचं माणूस म्हणता येईल, इतक्या जवळचं!
चंद्रूनं शांताला फोन करून सांगितलं, `शांता, माझी आई तुला भेटायचं म्हणते.’
`आणखी दोन तासांत जिम आटोपून येईन. तिथून येताना तुमच्या घरी मावशींना भेटायला येईन. आज रात्री त्यांना माझ्या घरी गप्पा मारायला घेऊन जाईन. नाही तरी उद्या सुट्टी आहे. येते संध्याकाळी. मावशींना सांगा!’
चंद्रूनं तो निरोप गौरम्मांना सांगितला.
सारं ऐकून गौरम्मांनी विचारलं, `चंद्रू, जिम म्हणजे काय रे?’
`शरीराला व्यायाम देण्याचं ठिकाण.’
`म्हणजे तालीम की काय? व्यायाम-शाळा असते तशी?’
`नाही. तिथं वेगवेगळ्या मशिनी असतात. घाम गळेल एवढा दररोज व्यायाम केला तर फिगर छान राहते. तुम्ही गावाला गेल्यावर मीही सुरू करणार आहे! माझ्या शनिवारच्या मैत्रिणींनी जिम सुरू केलंय. किती स्लिम झाल्या आहेत त्या!’ जमुना म्हणाली.
`मी म्हणते, स्लिम व्हायला जिम कशाला पाहिजे? शरीर वाकवून घरातली कामं केली तरी पुरेसं आहे. आमची विनिता पाहा! कपडे धुते, फरशी पुसते, बागेतली कामं करते. जिमशिवाय स्लिम आहे ती!’
प्रथमच विनिताचं एवढं कौतुक सासूच्या तोंडून जमुना ऐकत होती. तिनं नकळत भुवया उडवल्या.
गौरम्मांच्या मनात बेंगळूरच्या आठवणी फेर धरत होत्या. विनितेची अविश्रांत श्रमणारी आकृती त्यांच्या डोळ्यांसमोर आली.
शांताच्या घरी जाण्यासाठी गौरम्मा तयार झाल्या.
अलीकडे त्यांचं मन या घरात मुळीच रमत नव्हतं. जाण्यासाठी त्यांनी जमुनाला विचारलंही नाही. वाटलं, हिला काय विचारायचं त्यात? हिची कसली भीती?
शांताला भेटून खूपच दिवस– अंहं, वर्षं झाली होती. गौरम्मांच्या पांढऱ्या केसांमध्ये लक्षणीय भर पडली होती. शांताही स्थूल वाटत होती. गौरम्मांना पाहताच ती उत्साहानं म्हणाली, `मावशी, ओळख पटते की नाही? तुम्ही माझी नागवेणी घालत होता तेव्हा! आता पाहा तर! साधी वेणीही नाही.’
`तुझंच काय सांगतेस बाई! आता बहुतेक कुणीच वेणी घालत नाही. माझ्या धाकट्या सुनेची, विनिताची वेणी मात्र चांगली हातभर लांब असते हं! अगदी नागासारखी जाड आणि काळीभोर!’
जमुनाचा काही क्षण आ वासलेलाच राहिला.
शांता आणि गौरम्मा निघून गेल्या.
`शांता, तुझ्या आई कुठं असतात गं? कितीतरी दिवसांत त्यांचीही भेट झाली नाही.’
`हासनमध्येच राहते ती.’
`तू इथं कशी आलीस? तुझं लग्न झाल्याचं समजलं. तुझे यजमान कुठं असतात?’
`ती एक मोठीच कथा आहे. मन-मोकळ्या गप्पा मारण्यासाठीच मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन चाललेय. चंद्रू आणि जमुनापुढे सांगायला संकोच वाटतो, पण तुमच्यापुढे मात्र सांगावंसं वाटलं.’
असं काय घडलं असेल? गौरम्मा या विचारात गढल्या असतानाच तिचं घर आलं.
तो बंगला नव्हता- अपार्टमेंट होतं. शांतानं आपल्या घराचं दार उघडलं. त्या भागात अशी शेकडो अपार्टमेंटस् दिसत होती. ते दोन बेडरुमचं सर्वसाधारण घर होतं. तिथं अमेरिकेमधलं कुठलंही वैभव दिसत नव्हतं. घरात मोजकंच आवश्यक तेवढंच सामान होतं.
टेबलावर शांता आणि तिच्या मुलीचा फोटो होता.
गौरम्मा आणखी बुचकळ्यात पडल्या.
`मावशी, जेवता ना? माझा स्वयंपाक चालेल का तुम्हाला?’
`शांता, अमेरिकेत मला सगळं चालतं. पण आज गुरुवार ना! माझं जेवण नाही.’
शांतानं त्यांना केळी दिली. स्वत:चं जेवण तिनं मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवलं आणि म्हणाली, `माझी कथा ऐकताना कंटाळा येणार असेल तर सांगणार नाही. काही वेळा वाटतं, उगाच आपलं दु:ख कशाला वाटत जायचं?’
`असं का बोलतेस? तू तर माझ्या सुरभीसारखी मला!’
`सांगते. माझं लग्न मुकुंदाबरोबर झालं तेव्हा तो सॉफ्टवेअर कंपनीत ऑपरेटर म्हणून लहान नोकरी करत होता. माझे वडील देवळातले पुजारी- म्हणजे परिस्थिती साधारण होती. अभ्यासात मी नेहमी पुढं असायची.’
`होय. तुला बक्षीस मिळाल्याचं मीही पाहिलं आहे.’
`अप्पांनी तर अश्रू ढाळत सांगितलं- बाळ, तुला इंजिनियर करायची माझी ताकद नाही! मला मेरीट-सीट मिळूनही मी जाऊ शकले नाही. शेवटी फक्त बी. एस्सी केलं. तिथंही चांगले माक्र्स मिळाले. बेंगळूरला आले आणि कॉम्प्यूटर कंपनीमध्ये ट्रेनिंगचं काम मिळालं. त्याच वेळी लग्नही झालं.’
`तुझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या मुलीचं लग्न होणं काहीही कठीण नाही.’
`लग्न झालं तरी नोकरी सुरच होती. माझ्या सासू-सासऱ्यांनाही पैसे मिळवणाऱ्या सुनेचा अभिमान होता. मुकुंदाला माझ्यासारख्या पगाराची नोकरी मिळाली नाही. नवं काम पटकन आत्मसात करण्याची आणि भरपूर कष्ट घेण्याची माझी तयारी असायची. पगाराच्या रकमेतली पाऊण रक्कम सासू-सासऱ्यांकडे देत होते.’
`का? आम्ही आमच्या सुनेकडून एक पैसाही घेत नव्हतो.’
`सगळे तुमच्यासारखे नसतात, मावशी! पुढं मला आणखी चांगली नोकरी मिळाली. त्यातून मला इथं येण्याची संधी मिळाली. कॉम्प्यूटरच्या कामाच्या निमित्तानं खूप जणं इथं येतात. गेल्या वर्षी सुमारे पन्नास हजार कॉप्यूटर विषयातील लोकांना इथला व्हिसा मिळाला म्हणे. मुकुंदही आला.’
`आणि बाळ?’
`आम्ही इथं आल्यानंतर लता जन्मली. मुकुंद काही फार बुद्धिमान नाही. इथं आल्यानंतरही तो कुठल्या विशेष कामात रमला नाही. मीच भरपूर कष्ट घेऊन मुलीला वाढवत होते. शिवाय घरीही पैसे पाठवत होते.’
`म्हणजे तूही डॉलर-सून झालीस तर!’
`म्हणजे काय मावशी? डॉलर-सून, येन-सून, पौंड-सून– असे सुनांचे प्रकार आहेत की काय? सून म्हणजे सून!’
`जाऊ दे शांता! तुझ्या हे लक्षात येणार नाही. तू पुढं काय झालं ते सांग.’
`माझ्या सासूला कितीही डॉलर्स पाठवले तरी तिची भूक शमत नव्हती. दरवर्षी आम्ही येणार म्हटल्यावर लांबलचक सामानाची यादी पाठवून द्यायच्या. मीही न चुकता सगळं घेऊन जायची. पुढच्या वेळी पुन्हा तीच यादी- तेच सामान!’
`म्हणजे काय? तुझी सासू व्यापार करायची की काय?’
`देवाला ठाऊक! काय करायच्या कोण जाणे! एवढं करून त्यांच्या तोंडात सतत माझ्या जावेचंच गुणगान चालायचं, बिचारी, ती काही अमेरिकेत राहत नाही ना- वगैरे वगैरे. यावर मुकुंदही म्हणायचा- म्हातारपणी आई-वडिलांची सेवा करायची सोडून या परदेशात काय राहायचं- माघारी जाऊ या. पण मी मात्र नकार दिला. यातूनच भांडणं सुरू झाली.’
`केव्हा थांबली ही भांडणं?’
`डायव्होर्स झाल्यावर! दररोज माझ्या पैशावर तो मजा करायचा, दारु प्यायचा आणि वर मलाच मारायचा. शिवाय तक्रार करायचा- तू माझी सेवा करत नाहीस, उषा-वहिनी कशा माझ्या भावाच्या बुटांना पॉलिश करते- पायांना चोळून देते- तेल लावून न्हाऊ घालते- उलट उत्तरं देत नाही. तू मात्र काही ऐकत नाहीस. माझ्यापेक्षा जास्त कमावतेस म्हणून मस्तवाल झालीस- वगैरे-वगैरे.’
`तुझी हुशारी बघून त्याला मत्सर वाटत असेल.’
`तसंच होतं. नवऱ्याच्या हुशारीचा बायकोनं अभिमान वाटून घ्यायचा- बायको हुशार असली तरी तिनं मार खायचा काय? हा कुठला न्याय? आपल्या समाजात आया मुलांना उगाच फार शेफारुन ठेवतात. माझ्या सासूबाई तर म्हणतात- `पतीची सेवा करणं हा तुझा धर्म आहे!’ एकीकडे तुम्हाला माझ्या कमाईचा पैसाही हवा आणि मी सेवाही केली पाहिजे. मावशी, तुम्हीच सांगा- हे दोन्ही कसं शक्य आहे? एवढा वेळ आणि शक्ती कुठून आणू? दोन्ही नाटकं कशी जमणार?’
`शांता, मी काही घराबाहेर पडून नोकरी केली नाही. काय सांगू मी? मी फक्त गृहिणी म्हणून संसार केला. तरीही एक सांगते- सगळ्यांनी परस्परांना सांभाळून गुण्या-गोविंदानं राहिलं पाहिजे- हाच जीवनाचा परमधर्म! घरातल्या मोठ्यांनी संयम पाळायला पाहिजे- लहानांवर प्रेम करायला पाहिजे. मी चौथीपर्यंत शिकले- काय सांगू आणखी?’
`मावशी? माझ्या मुलीला मी उटीच्या हॉस्टेलमध्ये ठेवलंय. मुकुंदशी डायव्होर्स झाला, माहेरच्या माणसांनीही मलाच दोष दिला. घराला काळिमा लावलास म्हणाले. मला मात्र आजही मी जे वागले ते योग्य केलं असं वाटतं. मावशी, मला हा देश अतिशय आवडतो. माझ्यासारखीला आपल्या देशात उपेक्षेन पाहिलं जातं. त्या समाजात माझ्या मुलीलाही स्थान नाही. इथं कुणीही माझ्या वैयक्तिक जीवनात डोकावायला येत नाही. माझं काम पटल्यावर प्रमोशन देऊन मला इथं पाठवलं आहे. पुढच्या वर्षी लतालाही इथंच बोलावून इथल्या शाळेत घालेन. मी तर इथं सुखात आहे. तिथं असते तर असल्या नवऱ्याबरोबर सारं आयुष्य मला तळमळत काढावं लागलं असतं. इथं मी स्वतंत्र पक्ष्यासारखी राहते.’
दुसऱ्या दिवशी सकाळीच शांतानं विचारलं, `मावशी, इथं जवळच लक्ष्मीचं देऊळ आहे. जाऊ या?’
`पण बरंच दूर आहे ना ते?’
`नाही. फक्त पाचशे मैलांवर आहे. तिथंच प्रसादाची व्यवस्था आहे. मी ड्राईव्ह करेन. चला जाऊ या!’ तिच्या स्वरात उत्साह ओतप्रोत भरला होता.
आपलं कष्टमय जीवन बाजूला सारुन शांता किती उत्साहानं वावरत होती! चार-चौघांसारखा सुखी संसार असता तर कशी असती ही! त्या मूर्ख मुकुंदाचंच दुर्दैव म्हणायचं!
शांता अय्यंगारी पद्धतीनं रेशमी साडी नेसून समोर आली तेव्हा गौरम्मा भानावर आल्या. शांताचं ते रुप पाहून त्यांना आनंद झाला.
`मावशी, अलीकडे इथं खूप देवळं झाली आहेत. आधी पीट्सबर्गचं तिरुपतीचं देऊळ तेवढं होतं. आता भारतातल्या वेगवेगळ्या भागांतून अनेक माणसं इथं येतात. सगळे देव-देवतांच्या छायेत वाढले आहेत ना! त्यामुळे आता कितीतरी देवळं बांधली आहेत.’
`हे फक्त लक्ष्मीचं देऊळ आहे?’
`नाही. इतरही अनेक देव तिथं आहेत. गणपती, विष्णू, राम, शंकर, षण्मुख- प्रत्येकजण आपापल्या देवाची पूजा करु शकतो.’
`आणि पुजारी?’
`त्यांना भारतातून बोलावून घेतात. पाच वर्षांचा व्हिसा असतो त्यांचा.’
सुट्टीचा दिवस असल्यामुळे देऊळ भक्तांनी भरुन गेलं होतं. तरीही गडबड-गोंधळ नव्हता. कार पार्कींगसाठी वेगळी जागा होती. डस्टबीन, पावती-ऑफिस– थोडक्यात सांगायचं तर भारतातले देव आणि देऊळ अमेरिकेतल्या स्वच्छतेमुळे देखणे दिसत होते!
एकीकडे क्षीराभिषेक आणि रुद्राभिषेक चालले होते, तर दुसरीकडे एका तमिळ तरुणाचा गोऱ्या तरुणीशी विवाहविधी चालला होता. संस्कृत उच्चार न येणाऱ्या मुलाची इंग्लिशमध्ये उपनयनाची तयारी चालली होती. आणखी एकीकडे सुदर्शन होमाची तयारी चालली होती.
गौरम्मा आता एक नवाच अनुभव घेत होत्या.
रात्री शांतानं गौरम्मांना चंद्रूच्या घरी सोडलं आणि पुन्हा-पुन्हा भेटीचा आनंद घोळवून निघून गेली.
गौरम्मांचं भारतात परतायचं नक्की झालं तेव्हा एक दिवस चंद्रू म्हणाला, `अम्मा, जाण्याआधी विनोद शहाच्या आर्इंना माधुरी बेनना भेटू या. त्या तुला भेटायचं म्हणतात.’
`कोण रे?’
`माझ्या मित्राची आई. त्यांच्या घरी जाऊन येऊ या?’
`अरे, मला त्यांची भाषा येत नाही. नुसतं भेटून काय करायचं?’
`तेही वैष्णव आहेत. भेटायची खूप इच्छा आहे त्यांना.’
लगेच जमुना म्हणाली, `तुम्ही तिथं जात असाल तर मला वाटेत उमाकडे ड्रॉप करा. तिच्याकडे आजची शनिवारची मीटिंग आहे.’
गौरम्मांच्या मनात आलं- आज कुणाच्या सासूचा उद्धार होणार आहे कोण जाणे!
चंद्रूचं मन राखण्यासाठी गौरम्मा विनोद शहाच्या घरी गेल्या तेव्हा कुत्र्याएवढ्या मांजराला माशाचे तुकडे भरवत त्याची पत्नी मीरा अंगणात उभी होती.
`विनोद इथं नाही. त्याच्या आईच्या घरी गेलाय. आत या-’
`नको. माधुरीबेन कुठे आहेत?’
`त्या इथं राहत नाहीत. जवळच एक लहान अपार्टमेंट आहे. तिथं राहतात.’
`का?’ अभावितपणे गौरम्मांच्या तोंडून प्रश्न आला.
नंतर चंद्रू म्हणाला, `सासवा-सुनांचं पटत नाही. एकत्रा राहून भांडण्यापेक्षा वेगळं राहणं चांगलं ना?’
`मग इथं कशाला राहतात? त्यापेक्षा भारतात का राहत नाहीत?’
`विनोद त्यांचा एकुलता एक मुलगा. आणखी कुणीही नाही त्यांना. त्यामुळे इथंच राहतात.’
गौरम्मा मनोमन आनंदल्या- `देवा रे! माझी आज तशी परिस्थिती नाही ना!’
छोट्याश्या फ्लॅटमध्ये माधुरीबेन आणि रामभय्या त्यांचीच वाट पाहत होते.
भाषा कळायचा प्रश्न होता- पण भावना समजत होती. गौरम्मांना हिंदी बरंचसं समजत होतं, पण बोलता येत नव्हतं. माधुरीबेन जवळपास त्यांच्याच वयाच्या होत्या.
गौरम्मा भारतात परतत आहेत, त्या नशीबवान आहेत, अशी माधुरीबेनची भावना होती.
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

गुजराथी मिठाई, ढोकळा, खिचडी, चिवडा असे अनेक खाद्दपदार्थ त्यांनी तयार करुन ठेवले होते. त्यांच्या पायाच्या दुखण्यासाठी विनोद औषध आणायला गेला होता. ते समजताच चंद्रू म्हणाला, `तो सी. व्ही. एस.ला गेलाय ना? मीही जाऊन येतो.’
तिथं तिघंच राहिले.
`तुम्हाला प्यायला काही आणू? चहा-कॉफी की लस्सी-सरबत?’
`काहीही नको!’ गौरम्मांनी खुणेनं सांगितलं.
`का बरं? आमच्या घरी येऊन तसेच कसे जाल? तुम्ही खरं तर आमच्या गावी यायला हवं होतं. बडोद्दाजवळ खेडं आहे. तिथं आम्ही तुमची एवढी सरबराई केली असती की, काही विचारु नका. आमचे यजमान पोस्टमन होते. खेड्यातली सगळी मुलं पोस्टमनकाका म्हणून मागं लागायची. मीही गावातल्या बायकांना स्वयंपाकात किंवा पापड करण्यात मदत करत होते. काकांवर तर सगळ्यांचा फार जीव होता. स्वप्नातही आमचं गाव येतं आमच्या!’
त्या दोघींच्या डोळ्यांत पाणी होतं.
`असं असताना इथं का आलात?’
`कितीतरी मुलं देवाघरी गेल्यावर हा विनोद जगलाय! आम्ही याच्यासाठीच जगत होतो. त्याला सोडून राहणं कठीण होतं. त्यात आमच्या यजमानांची प्रकृती तोळा-मासा! त्यामुळे विनोदनं आग्रह धरला- सगळे एकेठिकाणी राहू या म्हणून. म्हणून इथं आलो आणि अडकून पडलो.’
`तुमची सून कुठली?’
`आमच्याच गावची. तिच्या वडिलांची गावात गिरणी होती. चार मुली त्यांना. घरची गरिबी होती. ओळखीचं घर-माणसं. मुलगीही रोज येणारी-जाणारी. ती आपलं करेल असं वाटलं होतं, पण तेच चुकलं. अगदी गरीब घरच्या मुलीला सून करुन आणू नये. गरिबाला ऐश्वर्य मिळालं की तो मध्यरात्री छत्र घेऊन फिरायला लागतो म्हणतात! अगदी खरंय ते!’
गौरम्मा मनात म्हणाल्या- `श्रीमंताघरची मुलगीही सून म्हणून आणू नये. नाहीतरी आमच्यासारखी गत होईल!’
त्या पुढं सांगू लागल्या, `ती इथं येऊन इंग्लिश शिकली, मच्छी-मांस खाऊ लागली! परवा तर गोमांस स्वस्त झालंय म्हणून निम्मं वासरुच घेऊन आली! देवा देवा! कसं बघवणार ते? दररोज भांडणं झाल्याशिवाय कशी राहतील? तिला भारताचा तिटकारा आहे. इथलं तेच योग्य, तेच मॅनर्स खरे म्हणते ती! शोभतंय की नाही हे न बघता ती त्यांच्यासारखे कपडे घालते. शेवटी विनोदनं आमच्यासाठी वेगळं घर केलं. घरात ती चुकूनही गुजराथी बोलत नाही.’
`विनोद काय म्हणतो?’
`काय म्हणणार? हिडिंबा गळ्यात बांधली, म्हणून रागावतो आमच्यावरच! बिचारा! आमच्या आणि तिच्यामध्ये तो अडकलाय. आमचं दुर्दैव! त्यानं इथल्याच एखाद्या गोऱ्या मुलीशी लग्न केलं असतं तर सुखी झाला असता की काय कोण जाणे!’
चंद्रू आणि विनोद औषध घेऊन परतले.
मिनिसोटाहून मुंबईपर्यंत विनोद निघाला होता. त्याच्या सोबतीनं जाण्यासाठी गौरम्मा तयार झाल्या.
त्यांनी चंद्रूला सांगितलं, `मी जाईन त्यांच्याबरोबर. मला सांताक्रूझच्या विमानतळावर सोडलं तर पुढं बेंगळूरला जाईन. तू काहीही काळजी करु नकोस!’
याचा अर्थ अम्माच्या मनातली घरी जाण्याची इच्छा प्रबळ झाली! चंद्रूच्या लक्षात आलं.
विनोदनंही बेंगळूरच्या विमानात बसवून देईन असं कबूल केलं. जमुना म्हणाली, `तुम्ही गेल्यावर आम्हाला त्रास होणार आहे! पण काय करणार! सुरभी-विनिताला इथली खुशाली सांगा. तुम्हाला आणि सुरभीला साडीच घेऊन देऊ की आणखी काही वस्तू हवी?’
`काहीही नको! अमेरिकेतल्या साड्या फाटत नाहीत की विरत नाहीत. त्या आपल्या प्रेझेंट म्हणून द्यायला चांगल्या! आमच्या गावी उत्तम, मैसूर सिल्क मिळतं. दुसऱ्या देशापुढे उगाच का नाक घासायचं?’ गौरम्मा ठसक्यात उत्तरल्या.
त्यानंतर पद्मानं दिलेल्या पैशांमधून विनिता आणि सुरभीसाठी चांगल्या पर्सेस, सुरेशसाठी आणि गिरीशसाठी शर्ट विकत घेतले. हर्षसाठी काही खेळणीही घेतली. मानसीला सोडून जायच्या विचारानं मात्र डोळ्यांत पाणी उभं राहात होतं. त्याचबरोबरच हर्षची आठवणही तिकडं खेचत होती.
निघायचा दिवस येऊन ठेपला. चंद्रू-जमुनानं वाकून नमस्कार केले. यानंतर आपण पुन्हा मुलाच्या घरी येणार नाही हे गौरम्मांना ठाऊक होतं. अशा सुनेबरोबर एवढ्या दूरवर चंद्रू एकटाच कसा निभावून जातो या विचारानं त्या प्रथमच कष्टी झाल्या.
विमानतळावर सगळ्यांना हात हलवून निरोप घेत गौरम्मा मायदेशी निघाल्या.
विमान नेहमीच्याच वेगानं चाललं असलं तरी गौरम्मांना मात्र वाटत होतं- किती सावकाश जातंय हे! किती उशीर होतोय! कधी एकदा बेंगळूरला पोहोचते असं त्यांना झालं होतं.
एक वर्षानंतर गौरम्मा बेंगळूरला येत होत्या.
या वर्षभरात त्यांनी पाहिलेलं जग, ऐकलेलं बोलणं आणि घेतलेल्या धड्यांचा अखेरचा श्वास असेपर्यंत विसर पडणार नाही एवढा प्रभाव होता.
नदीपलीकडचं कुरण नेहमीच हिरवंगार दिसत असतं.
वर्षापूर्वी दूरवर असणारी अमेरिका त्यांच्या रंगीत स्वप्नाचा एक महत्त्वाचा भाग होता. मनात येईल ते देणारा तो कल्पवृक्ष होता. तिथं दु:खाला थारा नाही असं त्यांना वाटत होतं.
या अमेरिकेत दु:ख-दुखवटा नाही, संकटं नाहीत, प्रतिकूल परिस्थिती नाही- थोडक्यात देव-देवता ज्याला स्वर्ग म्हणतात तो हाच असला पाहिजे असा गौरम्मांचा गाढ विश्वास होता.
त्याचबरोबर, जमुनाच आपली तारणहार आहे, तिच्या कृपादृष्टीमुळेच आपण या जगातील अडी-अडचणींना तोंड देऊ शकू अशा भ्रमात त्या होत्या.
याच कारणामुळे भारतातल्या देशी सुनेकडे त्या अनास्थेनं पाहत होत्या. हिची मला काय गरज? जमुनाचा मला पाठिंबा आहे, या भावनेत त्या होत्या. विनितेचं रुप, गुण, विद्दा आणि प्रेमाची त्यांच्या लेखी काहीच किंमत नव्हती.
त्यामुळे कटु शब्दांनी दुखवणं किंवा अनुल्लेखानं तिला टाळणं हे अगदी स्वाभाविक होतं.
या साऱ्यामागचं कारण होतं, तो अमेरिकेतला डॉलर! कारण एक डॉलर म्हणजे सुमारे चाळीस रुपये होतात ना!
आता मात्र सारं बदललं होतं. एखद्दाा नाटकातल्या ट्रान्स्फर-सीनप्रमाणे! आता त्यांची मतं पूर्णपणे बदलली होती.
आता नव्या जाणिवेच्या पार्श्वभूमीवर त्यांना विनिता पूर्णपणे वेगळी असल्याचा प्रत्यय येत होता. तिचा प्रत्येक गुण आता थोडा अधिकच चांगला वाटत होता. मातृप्रेम गमावलेली विनिता प्रेममयी असल्याचं त्यांना जाणवत होतं. ती प्रेमासाठी आसुसली होती. आपण दुर्लक्ष केल्यामुळे ती करपून गेली होती.
अशा अनेकविध भाव-भावनांनी भरलेल्या प्रवाशांना घेऊन विमान बेंगळूरच्या विमानतळावर उतरलं.
विमानतळावर आपल्या स्वागतासाठी शामण्णा, हर्ष, गिरीश आणि विनिता हजर असतील याविषयी त्यांची खात्री होती.
पण विमानतळावर केवळ शामण्णाच त्यांना दिसले.
क्षणभर त्या संतापल्या. एवढ्या लांबचा प्रवास करुन आले तरी मुलगा-सून स्वागताला कसे आले नाहीत? पाठोपाठ मनात आलं, कुठल्यातरी अर्जंट कामामध्ये अडकून पडले असतील.
बॅगा ट्रॉलीवर ठेवून त्या बाहेर आल्यावर शामण्णांनी चौकशी केली, `कसा झाला प्रवास?’
`छान झाला. घरी सगळे ठीक आहेत ना? गिरी-विनू आले नाहीत तुमच्याबरोबर?’
`आधी घरी चल. सगळे आरामात आहेत.’ पुढं बोलू न देता शामण्णांनी रिक्षा बोलावली.
समोर चिरपरिचित दुश्य दिसू लागलं. गाड्या, सायकल, रिक्षा, भाजीच्या हातगाड्या, गाई-वासरं, असह्य उकाडा, चित्र-विचित्र वास, धूळ- त्यांची आपण भारतात येऊन पोहोचल्याची खात्री झाली.
`आपल्यापैकी तू पहिली फॉरेन-रिटर्न झालीस! मला तर भीती वाटत होती- तू तिथंच रमशील आणि तिथं या म्हणून मलाच हट्टानं यायला लावशील. वाचलो मी!’
`काहीतरीच तुमचं! तुम्हाला इथं टाकून शेवटपर्यंत कसं कोण तिथं राहील?’ त्या तीव्र दुष्टिक्षोप टाकत म्हणाल्या.
`तू तर अमेरिकेला स्वर्ग मानतेस ना! म्हणून वाटलं, तिथंच तळ ठोकशील म्हणून!’
`काही नको तो स्वर्ग आपल्याला! किती केलं तरी आपलं गाव ते आपलंच! जाऊ दे तो विषय. विनिता-सुरभी काय म्हणताहेत? मला तर वरचेवर विनिताची आठवण होत होती. हर्षचीही!’
`काय? विनिता आणि हर्षची आठवण?’ शामण्णांनी दचकून विचारलं. सूर्य पश्चिमेला उगवल्याचा त्यांना भास झाला, `दोघांचीही?’
`होय. फारच आठवण झाली! सांगेन घरी गेल्यावर!’
`हं! मीही घरी गेल्यावरच सांगेन!’ शामण्णाही म्हणाले. त्यांचं मन दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनांकडे धावलं.
विनितानं कितीही प्रयत्न केले तरी तिला `उत्तम सून’ हे बिरुद मिळालंच नाही.
पदोपदी जमुनाचं कौतुक आणि विनिताचा पाणउतारा ठरलेला होता. कधी प्रत्यक्षा बोलून तर कधी न बोलता वागण्यातून दाखवलं जायचं.
विनितानंही पाहिलं होतं- गौरम्मांचा पूर्वीपासूनच असा स्वभाव होता असंही नव्हे. जमुना घरात आल्यानंतर त्यांच्यामध्ये हा बदल झाला होता.
विनितेला गिरीशचा राग यायचा. ती त्याच्यासमोर मन उघडं करून बोलायची आणि शेवटी म्हणायची, `या असं का करतात? माझं काय चुकलं यात?’
तो सांगायचा, `अगं, तो अम्माचा स्वभावच आहे. ती माझ्यापेक्षा चंद्रूला महत्त्व देत नाही काय? त्याचं मी कुठं वाईट वाटून घेतो?’
चंद्रू-गिरीश सख्खी भावंडं. त्यामुळे कदाचित तो सहन करत असेल. पण मी का सहन करू?
या विचारांमध्ये घेरली गेली की स्वभावत: शांत स्वभावाची विनिता भडकून उठत होती. तिथं हजारो डॉलर्स कमावून इथं कधीतरी केवळ शंभर डॉलर्स पाठवणारी जमुना दरमहा तीन हजार रुपये मिळवणाऱ्या विनितापेक्षा श्रेष्ठ होऊन बसल्याचं ती पाहत होती. इथं विनिता जे शारीरिक कष्ट घेत होती, त्यांची तर गौरम्मांच्या दृष्टीनं काडीमात्राही किंमत नव्हती.
घरात सतत जमुनायण चालायचं.
अशा वेळी विनितेला तीव्रपणे जाणवायचं- या डॉलरनं माझं आयुष्य खराब करून टाकलं!
दिवस जातील तसं विनिता स्वत:च्याच कोषात गुरफटून जाऊ लागली. अशाच मन:स्थितीत तिनं आपल्या गावी जाऊन आपलं बाळंतपण करुन घेतलं होतं.
शामण्णा तिची मनस्थिती निरखत होते. पत्नी अमेरिकेला जाऊन आल्यानंतर तर विनितेचं जगणं आणखी मनस्तापानं भरुन जाईल हे कुणा ज्योतिषयानं सांगायची गरज नव्हती.
लहानग्या हर्षला सांभाळत घरची कामं करणं तिला कठीण जाणार नाही, पण रात्रं-दिवस जमुना-पुराण मात्र तिला मनस्ताप देत राहील हे स्पष्ट होतं.
तसं पाहिलं तर विनिता शांत स्वभावाची होती. तिच्या अवास्तव अपेक्षाही नव्हत्या. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की कडेलोट होणारच.
याचा परिणाम म्हणून तिच्या मनात जमुनाविषयी पराकोटीचा द्वेष निर्माण झाला होता. आपण सर्वच बाबतीत जमुनापेक्षा सरस आहोत हे सत्य तिलाही समजत होतं. पण जमुना डॉलर-बहू झाली होती ना! विनिता भिक्षुकिणीच्या स्थानावर होती.
तिलाही वाटत होतं- मीही अमेरिकेत असते तर अशीच तीन वर्षांतून तीस दिवसांसाठी आले असते, येताना सगळ्यांसाठी साड्या आणल्या असत्या, वृद्ध सासू-सासऱ्यांची कणभरही सेवा न करता त्यांची लाडकी सून होऊन राहिले असते!
कधीकधी तिला वाटायचं- देवा रे, या डॉलरची किंमत एक रुपया कर. म्हणजे या सगळ्यांची मस्ती भुईसपाट होईल! रुपयापेक्षा कमी किंमत होऊन त्यांची परिस्थिती आमच्यापेक्षाही हीन होऊ दे! मग पाहतेच त्या डॉलर-सुनेचा तोरा!
यापासून दूर जायचं असेल तर त्या घरापासून दूर जायला पाहिजे, त्या डॉलर-बहूच्या छायेपासून दूर- या सासूपासून दूर- त्या लोभी नणंदेपासून दूर! जिथं केवळ आपल्याला आपल्या कर्तृत्वावरन मान मिळेल अशा ठिकाणी जायला पाहिजे!
पण हे कसं शक्य आहे? अपार मायेचा सागर असलेल्या शामण्णांना सोडून कुठं जायचं?
शामण्णा काही तिचे केवळ सासरे नव्हते! तिच्या प्रत्येक भावनेची जाण ठेवणारे घरातले आत्मीय होते. तिच्या बारीकसारीक सुखदु:खाची दखल घेणारे अत्यंत जवळचे स्नेही झाले होते. अनेकदा गिरीशनं तिच्या भावनांची हेळसांड केली तरी ते तिचं अंतर्मन स्पष्टपणे वाचत होते. तिच्या मौनाचाही अर्थ त्यांना उकलत होता.
एकदा मौनाचा अर्थ उमजण्याइतकं जवळचं नातं जुळल्यावर शब्दांचा अर्थ समजून घेणं फारच सोपं होतं.
गौरम्मा `जमुना, वीणा काय सुरेख वाजवते!’ असं कौतुक करू लागल्या की शामण्णा लगेच म्हणायचे, `पण आमच्या विनूच्या आवाजाची सर कुणाला येईल? विनू, म्हण ना एखादं गाणं! किती दिवसांत ऐकलं नाही!-’
साहजिकच जमुनेच्या कौतुकाला तेवढ्यापुरती का होईना खिळ बसायची. काही वेळा तर सुरभीही आईवर या कौतुकामुळे चिडायची.
अशा सासऱ्यांना कसं सोडून जायचं? एकीकडे विनिताचं मन स्वातंत्र्याची अपेक्षा करत असलं, तरी दुसरीकडे या पितृहृदयी सासऱ्यांच्या मायेत गुरफटून जाऊ इच्छित होतं.
अशा गौरम्मा अमेरिकेतून परतल्यावर हर्षची उपेक्षा करून मानसीचं गुणगान केल्याशिवाय कशा राहतील?
अशा परिस्थितीत वाढणाऱ्या हर्षच्या मनावर काय परिणाम होईल? तोही बधिर झाल्याशिवाय राहणार नाही.
गिरीश आपल्या अनेक उद्योगांमुळे सतत घराबाहेरच राहतो. ह्या गुणगानामुळे सतत घरात असणाऱ्या विनितेच्या कानाला भोकं पडतील.
मग तिनं कुठं जावं? काय करावं?
आपण न पाहिलेली, केवळ इतरांकडून जिचं भरपूर वर्णन ऐकलं, जिनं फक्त फोटोमध्ये दर्शन दिलं ती अमेरिका असेल तरी कशी? तीन-चार हजारांत भागण्यासारखं असतं तर एकदा बघून तरी आली असती! पण साठ हजारांचं तिकीट ही गरीब मास्तरीण कशी काढू शकेल?
शशीसारख्या मुलीशी ठरलेलं लग्न शंकरनं केवळ अमेरिकेला जायला मिळावं म्हणून मोडलं होतं. असलं वागायला लावणारी अमेरिका असेल तरी कशी?
केवळ अमेरिकेला गोपी जाणार नाही म्हटल्यावर आईचं ऐकून प्रेम पायदळी तुडवणाऱ्या सुरभीची आठवण झाली. हेही करायला लावणारी अमेरिका असेल तरी कशी?
कृष्णाच्या मोहक मुरलीवर मोहित होऊन सगळ्या गोप-स्त्रिया घरदार सोडून निघून यायच्या म्हणे. तसंच या अमेरिकेच्या हाकेसरशी साऱ्या जगातील माणसं प्रेम, माया आणि इतर नात्याची बंधनं सोडून धावत सुटतात! कोणती शक्ती आहे अमेरिकेकडे?
आईच्या मुलांवरील प्रेमामध्ये भेदभाव नसतो असं सगळे म्हणतात. पण विनिता हे कसं मान्य करेल? एका डोळ्यात चुना आणि दुसऱ्या डोळ्यात लोणी घालायची कला गौरम्मांनाच जमते! गिरीश खिजगणतीत नाही आणि चंद्रू मात्र देवतासमान!
आपल्या डोक्याची दोन शकलं होतील की काय असं विनितेला वाटू लागलं. असह्य झालं तेव्हा ती अर्ध्या दिवसाची रजा टाकून घरी आली. पुढच्या महिन्यात सासू येणार या विचारानंच तिचं डोकं भणभणू लागलं.
सासऱ्यांना जाग येऊ न देता हळूच दार उघडत असताना शामण्णांनीच दार उघडलं. म्हणजे शामण्णा जागेच होते तर! विनितेला आश्चर्य वाटलं. कारण तिला ठाऊक होतं, शामण्णांना ही दुपारची झोप अत्यंत प्रिय होती.
विनितानं लगोलग शामण्णांना कॉफी करून दिली. शामण्णांचा चेहरा उतरला होता.
कॉफी पिता-पिता ते म्हणाले, `विनिता, माझ्या मनात एक विचार आला आहे. त्यावर तूही तुला काय वाटतं ते सांग. संकोच करु नकोस.’
`काय अण्णा?’
`तुझी सासू आणखी एक-दीड महिन्यांत परत येईल. आतापर्यंत तिनं जी अमेरिका वर्णनाची लांबलचक पत्रं लिहिली आहेत, त्याचं मोठालं पुस्तकच होईल. मला वाटतं, अजूनही तिच्या मनातला अमेरिका-मोह कमी झालेला नाही.’
त्यांची नजर झोपलेल्या हर्षकडे गेली. घशाशी आलेला आवंढा गिळत ते म्हणाले, `तू मला मुलीपेक्षाही अधिक जीव लावला आहेस! तुझ्या मानसिक दु:खाला हे सारं कारणीभूत झालंय हे मीही पाहतोय. तू वेगळं घर करुन निघून जा.’
आश्चर्यचकित व्हायची पाळी विनितेची होती.
मनात हजार वेळा आलेला तो विचार संस्कार, संकोच आणि सासऱ्यांचा स्वभाव यामुळे व्यक्त न करता ती घुसमटत होती, तोच विचार अण्णा सरळपणे मांडत होते! हे स्वप्न नाही, वास्तव आहे! विनितेचा स्वत:वरच विश्वास बसेना.
शामण्णाच पुढं म्हणाले, `विनू, हा निर्णय तुझ्या दृष्टीनं अत्यावश्यक आहे. अर्थात हर्षला सोडून राहाणं मलाही सोपं जाणार नाही!’ त्यांनी डोळे टिपले.
त्यांच्या डोळ्यांतलं पाणी पाहून विनिता विरघळली. वाटलं, `मीच जमुना आणि सासूबार्इंबरोबर नीट जुळवून घेऊ शकले नाही की काय? माझंच चुकलं की काय?’
तिनं हे बोलून दाखवताच ते म्हणाले, `नाही, विनू! तुझं काहीही चुकलेलं नाही. मला तुझ्या मृदु स्वभावाची ओळख पूर्णपणे आहे. त्यामुळेच मी तुला वेगळी राहा म्हणतोय. इतकं चांगलं असणं योग्य नव्हे, विनू! मातीमध्ये दगडाचीही आवश्यकता असते! तुझीच चूक आहे असं का तू मानतेस? जमुनानं तुझ्याशी कुठं जुळवून घेतलं? गौरीनं कधी तुझ्या मनाचा विचार केला? सतत इतरांची चाकरी करण्याची गुलामगिरी तू पाळू नकोस. त्यामुळे मनात स्वत:विषयी क्षुद्रतेची भावना खोलवर रुजली जाते. तुझं आजवरचं आयुष्य इतरांसाठी कष्ट करण्यात गेलं आहे. यानंतर तरी तू मोकळ्या मनानं गा! तुझ्यासाठी जग!’
`अण्णा, कुठं जाऊ मी?’
`तुझ्या घरी. धारवाडमध्ये तुझं घर आहे, विसरलीस? गिरीशला बेंगळूरहून धारवाडला बदली मिळणं कठीण नाही. डी.इ.ओ.ला सांगून मी तुझीही तिथं बदली होईल हे पाहीन. आणखीही सांगून ठेवतो ऐक. यानंतर तुम्ही इथं पैसे पाठवायचे नाहीत. चंद्रूनंही पाठवायची गरज नाही. आम्हां दोघांना पुरेसं पेन्शन येतं. तुम्ही गेल्यावर माडीवरची जागा भाड्यानं देईन. आमच्यावर तशी कुठली जबाबदारी नाही. खर्चही कमी आहे.’
वृद्धत्वाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या सासऱ्यांच्या मनातली उदारता बघून विनितेचा आवाज कातर झाला, `अण्णा, तुम्ही आमच्याबरोबर येत नाही?’
`विनू, तुझं घर ते माझंच नाही काय? तुम्ही काही परदेशी जात नाही! इथं रात्री बसमध्ये बसलं तर सकाळी तुझ्या घरी येऊन पोहोचू. हात-पाय चालेनासे झाल्यावर आम्हांला तरी कोण बघणार आहे? तूच आमची म्हातारपणाची काठी आहेस. आमची म्हातारपणाची काठी मोडून जाऊ नये, म्हणूनच तुला वेगळी राहा म्हणतोय मी!’
विनिता आश्चर्यानं सासऱ्यांकडे पाहत राहिली.
`विनू, ती पुराणातली कथा ठाऊक आहे ना? कद्रू आणि विनुता नावाच्या दोन सवती होत्या. इथं तुम्ही दोघी जावा-जावा आहात एवढाच फरक. ती विनुता होती आणि तू विनिता!’
विनितेच्या चेहऱ्यावर त्याही परिस्थितीत हसू उमटलं.
`कद्रूला नेहमीच विनुतेविषयी असूया वाटायची. कद्रूला शंभर मुलं होती. विनुतेला मुलं नव्हती. पुढं क्षुद्र फसवणुकीमुळे विनुता कद्रुची दासी झाली. तिची दास्यातून सुटका करण्यासाठी तिच्या पोटी पुत्र जन्मतो आणि स्वर्गातून अमृत घेऊन येतो. तोच गरुड. ही कथा खरी आहे की काल्पनिक आहे कोण जाणे! ही कथा ऐकताना मला मात्र नेहमीच तुझी आठवण होते. हर्ष भरपूर शिकून अमेरिकेत जाईल आणि जमुनापेक्षा जास्त डॉलर्स मिळवेल तेव्हा तुझी या डॉलर-शापातून मुक्तता होईलच. पण त्यासाठी एवढा काळ तू गुलामीतच राहायचं काय?’

Return to “Marathi Stories”